शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन

By admin | Updated: March 18, 2017 01:18 IST

शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच सध्या विधानसभेत कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी,

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन वर्धा : शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी तसेच सध्या विधानसभेत कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी, शुक्रवारी महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, शेतीसाठी पुरेशी वीज नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत, दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशी मदत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारच्या धोरणामुळे योग्य भावही मिळत नाही. भाजप सरकारच्या काळात गत अडीच वर्षांत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारावर पोहचला आहे. सरकारजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचे राज्यकर्ते विधाने करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून कर्जमाफी मिळवणारच, असे नारे महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनादरम्यान दिले. शेतकऱ्यांवरील सर्व प्रकारचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, भरत चौधरी, कवडू बुरंगे, किशोर कडू, रामदास कुबडे, जयंत भालेराव, राजहंस राऊत, केशव तितरे, संजय भगत, अभय पुसदकर यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्त्ये उपस्थित होते.(प्रतिनिधी)