शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सुविधांअभावी चौरस्ता समस्यांचे आगार

By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST

केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़

देवळी : केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़ येथे गतिरोधक निर्माण करण्यात आले नसून प्रवासी निवाराही बांधण्यात आलेला नाही़ यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागते़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ अनेक प्रकारच्या सुविधांअभावी शहरातील पुलगाव-वर्धा चौरस्ता समस्यांचे माहेरघर बनला आहे़ शिवाय जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरत आहे़ बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांना अपघातग्रस्त व्हावे लागत आहे़ या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आलेले नाही़ यामुळे वाहनांची सुसाट वर्दळ असते़ निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली नाही़ यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला कर्मचारी व वृद्धांना उन्हामध्ये उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते़ याबाबत जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आल्यात; पण अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फटिंग यांनी व्यक्त केली़ नागपूरहून देवळी मार्गे येणार्‍या बर्‍याच बसेस बसस्थानकावर न जाता परस्पर पुलगावला जातात़ या चौरस्त्यावर थांबतात़ यामुळे प्रवाशांची येथे मोठी गर्दी होते़ यात विद्यार्थी, महिला, कर्मचारी व वृद्धांचा भरणा असतो़ बांधकाम विभागाच्यावतीने या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले नाही़ शिवाय मार्गदर्शक रंगित पट्टेही मारण्यात आले नाही़ यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते़ रंगित पट्टे नसल्याने रस्ता ओलांडत असताना अनेक अपघात होताहेत़ निवारा नसल्याने तप्त उन्हात वा एका कोपर्‍यात झाडाच्या सावलीत उभे राहावे लागते़ या चौरस्त्यावर रात्री १२ वाजेपर्यंत वर्दळ राहत असल्याने असामाजिक तत्व व व्यसनाधिन युवकांचाही त्रास असल्याचे प्रवाशांद्वारे सांगितले जाते़ याबाबत आगार प्रमुख व पोलीस ठाण्यात सूचना देण्यात आली; पण अद्याप पोलीस गस्तही वाढविण्यात आली नाही़ शिवाय प्रवासी निवार्‍याची निर्मितीही करण्यात आलेली नाही़ बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ व पोलिसांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुविधा व सुरक्षा पुरविणे गरजेचे झाले आहे़(प्रतिनिधी)