शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

सुविधांअभावी चौरस्ता समस्यांचे आगार

By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST

केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़

देवळी : केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़ येथे गतिरोधक निर्माण करण्यात आले नसून प्रवासी निवाराही बांधण्यात आलेला नाही़ यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागते़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ अनेक प्रकारच्या सुविधांअभावी शहरातील पुलगाव-वर्धा चौरस्ता समस्यांचे माहेरघर बनला आहे़ शिवाय जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरत आहे़ बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांना अपघातग्रस्त व्हावे लागत आहे़ या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आलेले नाही़ यामुळे वाहनांची सुसाट वर्दळ असते़ निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली नाही़ यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला कर्मचारी व वृद्धांना उन्हामध्ये उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते़ याबाबत जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आल्यात; पण अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फटिंग यांनी व्यक्त केली़ नागपूरहून देवळी मार्गे येणार्‍या बर्‍याच बसेस बसस्थानकावर न जाता परस्पर पुलगावला जातात़ या चौरस्त्यावर थांबतात़ यामुळे प्रवाशांची येथे मोठी गर्दी होते़ यात विद्यार्थी, महिला, कर्मचारी व वृद्धांचा भरणा असतो़ बांधकाम विभागाच्यावतीने या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले नाही़ शिवाय मार्गदर्शक रंगित पट्टेही मारण्यात आले नाही़ यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते़ रंगित पट्टे नसल्याने रस्ता ओलांडत असताना अनेक अपघात होताहेत़ निवारा नसल्याने तप्त उन्हात वा एका कोपर्‍यात झाडाच्या सावलीत उभे राहावे लागते़ या चौरस्त्यावर रात्री १२ वाजेपर्यंत वर्दळ राहत असल्याने असामाजिक तत्व व व्यसनाधिन युवकांचाही त्रास असल्याचे प्रवाशांद्वारे सांगितले जाते़ याबाबत आगार प्रमुख व पोलीस ठाण्यात सूचना देण्यात आली; पण अद्याप पोलीस गस्तही वाढविण्यात आली नाही़ शिवाय प्रवासी निवार्‍याची निर्मितीही करण्यात आलेली नाही़ बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ व पोलिसांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुविधा व सुरक्षा पुरविणे गरजेचे झाले आहे़(प्रतिनिधी)