शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बेदम मारहाणीतूनच झाला मोतीरामचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2014 00:27 IST

पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले.

 वर्धा : पुलगाव तालुक्यातील रसुलाबाद येथील मोतीराम पंजाब मेश्राम यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्ससंस्कारही करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गावातील काही लोकांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाचा मुलगा आकाश मेश्राम याने केला आहे. या आरोपाचे निवेदन त्यांने पुूलगाव पोलिसांना दिले असून मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे. निवेदनात असलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील मोतीराम मेश्राम यांचा २४ एप्रिल २०१४ ला मृत्यू झाला. गावातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर गावातील अनेकांनी तुझ्या वडिलांना बेदम मारहाण झाल्यानेच त्यांचा जीव गेला, अशी माहिती आकाशला दिली. २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास गावातील सहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली, यातच त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी मी गावातील रामभाऊ तांबे यांच्याकडील लग्नसमारंभात होतो. रात्री १० वाजता मी घरी परत आलो. माझ्या वडिलांनी मला या लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. परंतु, किरकोळ मारहाण झाली असे समजून मी उद्या जे काही करायचे ते करू, असे सांगून त्यांची समजूत काढली. दुसर्‍या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, असे निवेदनात म्हटले आहे. संशय असल्यामुळे माझ्या वडिलांना मी अग्नी दिला नाही, त्यांचा मृतदेह पुरला. आरोपींनी माझ्या वडिलांच्या गुप्तांगावर, छाती, पोटावर मारहाण केल्याने त्यांना गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा आरोपही केला आहे. वडिलांच्या मृत्यूची चौकशी करावी, साक्षीदारांच्या साक्षी नोंदवाव्या आणि पुरण्यात आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी आकाश मेश्राम याने निवदेनातून केली आहे. त्यांनी पोलिसात दिलेल्या निवदेनावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)