शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

‘त्या’ सन्मानातून मातृशक्तीने दिली मायेची ऊब

By admin | Updated: October 17, 2016 01:03 IST

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते,

मेघना वासनकर : शहिदांच्या वीर पत्नींचा सत्कार, गांधीनगरातील शारदा महिला मंडळाचा उपक्रमपुलगाव : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते, हे आपण समजू शकत नाही. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारा दारूगोळा भांडार शहरात आहे. काही महिन्यांपुर्वी या भांडारात अग्नीस्फोट झाला. त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती देत शहर व ग्रामस्थांचे जीव वाचविले; पण जे शहीद झाले, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचे दु:ख कुणाला कमी करता येत नाही; पण मातृशक्ती शारदा महिला मंडळाने अग्नीस्फोट व कारगील युद्धातील शहिदांच्या वीरपत्नीचा सन्मान करून मायेची ऊब दिली, असे मत न.प. मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी व्यक्त केले.मातृशक्ती शारदा महिला मंडळाद्वारे गांधीनगर परिसरात शहिदांच्या वीरपत्नीचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीष साहू तर अतिथी म्हणून प्राचार्य प्रमिला नकाशे, नगर सेविका चंद्रकला डोईफोडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, प्रभाकर शहाकार, कृउबा समितीचे राजाभाऊ खेडकर उपस्थित होते.गायिका वर्षा बाभळे यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात उरी येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद््नंतर स्थानिक अग्नीस्फोटात शहीद झालेल्या स्व. चोपडे, दांडेकर, मेश्राम, पाखरे, येसनकर व कारगील शहीद स्व. कृष्णाजी समरीत व स्व. सोहनसिंह पवार यांच्या वीर पत्नीचा साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगराध्यक्ष साहु यांनी शहरातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात; पण मातृशक्ती महिला मंडळाने मागील वर्षी ज्येष्ठ मातृशक्तीचा सत्कार केला. यावर्षी शहिदांच्या वीर पत्नीचा सत्कार करून सामाजिक ऋण फेडले. नागरिकांच्या सहकार्यानेच नगर परिषदेला स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय हागणदारी मुक्त शहर पुरस्कार प्राप्त झाला. पुढेही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.गांधी नगरातील खेडकर कुटुंबीयांनी स्व. कोकीळाबाई खेडकर यांच्या स्मृत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविकातून माजी प्राचार्य मीना देशपांडे यांनी शहिदांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकत मंडळाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संगीता शहाकार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेणुका खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा श्रीराव, कार्याध्यक्ष संगीता देशमुख, खेडकर कुटुंबीय आदींनी सहकार्य केले. बाभळे यांनी गायलेल्या वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)