शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सन्मानातून मातृशक्तीने दिली मायेची ऊब

By admin | Updated: October 17, 2016 01:03 IST

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते,

मेघना वासनकर : शहिदांच्या वीर पत्नींचा सत्कार, गांधीनगरातील शारदा महिला मंडळाचा उपक्रमपुलगाव : देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणारा शिपाई प्राणाची आहुती देतो. वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचे दु:ख काय असते, हे आपण समजू शकत नाही. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असणारा दारूगोळा भांडार शहरात आहे. काही महिन्यांपुर्वी या भांडारात अग्नीस्फोट झाला. त्यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती देत शहर व ग्रामस्थांचे जीव वाचविले; पण जे शहीद झाले, त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचे दु:ख कुणाला कमी करता येत नाही; पण मातृशक्ती शारदा महिला मंडळाने अग्नीस्फोट व कारगील युद्धातील शहिदांच्या वीरपत्नीचा सन्मान करून मायेची ऊब दिली, असे मत न.प. मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी व्यक्त केले.मातृशक्ती शारदा महिला मंडळाद्वारे गांधीनगर परिसरात शहिदांच्या वीरपत्नीचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीष साहू तर अतिथी म्हणून प्राचार्य प्रमिला नकाशे, नगर सेविका चंद्रकला डोईफोडे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष रंजना पवार, प्रभाकर शहाकार, कृउबा समितीचे राजाभाऊ खेडकर उपस्थित होते.गायिका वर्षा बाभळे यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमात उरी येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तद््नंतर स्थानिक अग्नीस्फोटात शहीद झालेल्या स्व. चोपडे, दांडेकर, मेश्राम, पाखरे, येसनकर व कारगील शहीद स्व. कृष्णाजी समरीत व स्व. सोहनसिंह पवार यांच्या वीर पत्नीचा साडी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगराध्यक्ष साहु यांनी शहरातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात; पण मातृशक्ती महिला मंडळाने मागील वर्षी ज्येष्ठ मातृशक्तीचा सत्कार केला. यावर्षी शहिदांच्या वीर पत्नीचा सत्कार करून सामाजिक ऋण फेडले. नागरिकांच्या सहकार्यानेच नगर परिषदेला स्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय हागणदारी मुक्त शहर पुरस्कार प्राप्त झाला. पुढेही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.गांधी नगरातील खेडकर कुटुंबीयांनी स्व. कोकीळाबाई खेडकर यांच्या स्मृत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रास्ताविकातून माजी प्राचार्य मीना देशपांडे यांनी शहिदांच्या कर्तबगारीवर प्रकाश टाकत मंडळाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन संगीता शहाकार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रेणुका खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा श्रीराव, कार्याध्यक्ष संगीता देशमुख, खेडकर कुटुंबीय आदींनी सहकार्य केले. बाभळे यांनी गायलेल्या वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)