शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चूल-मूल सांभाळणारी महिला बचतगटांमुळे उद्योजक झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:15 IST

पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : उमेदचा विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ते भारतीय स्टेंट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्या वतीने बचत गट महामेळाव्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर भारतीय स्टेट बँकेचे राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार, महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार, भारतीय रिजर्व बँक नागपूर एपआयडीडीचे सहा. महाव्यवस्थापक एस. अग्रवाल, एम.एस.आर.एल.एम. मुबंईचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बिरेंद्र कुमार, भारतीय स्टेट बँक झोन १ नागपूरचे उप महाव्यवस्थापक एम.वी.आर. रविकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महिला बचत गटाना बँकेकडून खेळते भांडवल मिळते, म्हणुन केवळ कर्ज न घेता मिळालेल्या कर्जाचा व्यवसायासाठी उपयोग करुन बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे. यामुळे गटातील महिलांचा विकास होण्यास मदत होईल. यासाठी बचत गटानी शेळी पालन, कुकुटपालन, गोपालन, सामूहिक शेती सारखा व्यवसाय करावा. तसेच घरगुती लघु उद्योग सुरुकरावा. ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर बँक नसलेल्या २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये बँके मार्फत ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्याच्या सुचना यावेळी नवाल यांनी दिल्या. तसेच इतर बँकांनी बचत गटांना कर्ज मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे असेही सांगितले.केवळ कर्ज देणे एवढेच बँकेचे सिमित उद्दिष्ट नसून महिला बचत गटाच्या माध्यमाने महिलांचा आर्थिक विकास करणे हा उद्देश आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये बँक असावी हे रिजर्व बँकेचे धोरण आहे. त्यामुळे २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना तसेच बचत गटांना बँकेच्या सेवा घरपोच मिळणार आहे, असे अजयकुमार यांनी सांगितले. तसेच बचत गटातील महिलांनी विमा योजना, स्वास्थ योजना, पेंशन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्याच्या बचत गटाच्या चळवळीत जिल्हाधिकारी हे प्रेरणास्थान आहे. त्यांनी बचत गटासाठी केलेली कामे उल्लेखनिय आहे. एम.एस.आर.एल.एम. च्या सहाय्याने राज्यात ४० लाख महिलांना जोडले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ हजार महिला बचत गटाचा समावेश आहे. यात १४ लाख महिला कार्यरत आहे. जिल्ह्यातील ७१४ गटांना भारतीय स्टेट बँकेच्यावतीने ११ कोटी ४० लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.एमएसआरएलएमच्या सहाय्याने मोठ्या कंपन्यासोबत बचत गटाच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी करार करण्यात आलेला असून गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन केल्यास कंपनीच्या सहायाने मोठ्या शहरामध्ये बचत गटाच्या मालाला चांगला भाव मिळेल. यासाठी बचत गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन करावे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते तिसरा टप्पा पार करणाऱ्या महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ भोतमांगे, मनीष कावळे, अमोल भागवत, कल्पना बोस, सुकेशनी पाथडे, तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा शेवडे, विलास झोटींग, वर्षा कोहळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी