शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

चूल-मूल सांभाळणारी महिला बचतगटांमुळे उद्योजक झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:15 IST

पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : उमेदचा विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर्वी चार भिंतीच्या आत चूल आणि मुल सांभाळणारी महिला आता बचत गटाच्या माध्यमाने कुंटुबांचा उद्धार करण्यासाठी व्यवसाय करण्याकरिता उंबरठ्याबाहेर निघाली आहे. याचे अनुकरण इतर महिलांनी करुन उन्नती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ते भारतीय स्टेंट बँक क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्या वतीने बचत गट महामेळाव्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर भारतीय स्टेट बँकेचे राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार, महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार, भारतीय रिजर्व बँक नागपूर एपआयडीडीचे सहा. महाव्यवस्थापक एस. अग्रवाल, एम.एस.आर.एल.एम. मुबंईचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बिरेंद्र कुमार, भारतीय स्टेट बँक झोन १ नागपूरचे उप महाव्यवस्थापक एम.वी.आर. रविकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक ईलमे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महिला बचत गटाना बँकेकडून खेळते भांडवल मिळते, म्हणुन केवळ कर्ज न घेता मिळालेल्या कर्जाचा व्यवसायासाठी उपयोग करुन बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढवावे. यामुळे गटातील महिलांचा विकास होण्यास मदत होईल. यासाठी बचत गटानी शेळी पालन, कुकुटपालन, गोपालन, सामूहिक शेती सारखा व्यवसाय करावा. तसेच घरगुती लघु उद्योग सुरुकरावा. ५ किमी पेक्षा जास्त अंतरावर बँक नसलेल्या २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये बँके मार्फत ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्याच्या सुचना यावेळी नवाल यांनी दिल्या. तसेच इतर बँकांनी बचत गटांना कर्ज मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे असेही सांगितले.केवळ कर्ज देणे एवढेच बँकेचे सिमित उद्दिष्ट नसून महिला बचत गटाच्या माध्यमाने महिलांचा आर्थिक विकास करणे हा उद्देश आहे. २ हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये बँक असावी हे रिजर्व बँकेचे धोरण आहे. त्यामुळे २ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार असून यामुळे नागरिकांना तसेच बचत गटांना बँकेच्या सेवा घरपोच मिळणार आहे, असे अजयकुमार यांनी सांगितले. तसेच बचत गटातील महिलांनी विमा योजना, स्वास्थ योजना, पेंशन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.जिल्ह्याच्या बचत गटाच्या चळवळीत जिल्हाधिकारी हे प्रेरणास्थान आहे. त्यांनी बचत गटासाठी केलेली कामे उल्लेखनिय आहे. एम.एस.आर.एल.एम. च्या सहाय्याने राज्यात ४० लाख महिलांना जोडले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ हजार महिला बचत गटाचा समावेश आहे. यात १४ लाख महिला कार्यरत आहे. जिल्ह्यातील ७१४ गटांना भारतीय स्टेट बँकेच्यावतीने ११ कोटी ४० लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे, असे शिंदे यांनी सांगितले.एमएसआरएलएमच्या सहाय्याने मोठ्या कंपन्यासोबत बचत गटाच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी करार करण्यात आलेला असून गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन केल्यास कंपनीच्या सहायाने मोठ्या शहरामध्ये बचत गटाच्या मालाला चांगला भाव मिळेल. यासाठी बचत गटांनी चांगल्या प्रतिच्या मालाचे उत्पादन करावे असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते तिसरा टप्पा पार करणाऱ्या महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ भोतमांगे, मनीष कावळे, अमोल भागवत, कल्पना बोस, सुकेशनी पाथडे, तालुका अभियान व्यवस्थापक मनीषा शेवडे, विलास झोटींग, वर्षा कोहळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी