शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

समुद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:28 IST

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरांसह गोठ्यांचेही नुकसान : संभाव्य धोक्यामुळे शेकडो कुटुंबीयांना हलविले होते सुरक्षित ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघाड दिली आहे. गुरूवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जलाशयांच्या पाण्याच्या पातळीवर वाढ झाली आहे. शिवाय सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने याचा परिणाम समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावातील १०९ कुटुंबियांवर झाला. पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने हमदापूर येथील १६, सिंदी (रेल्वे) येथील ५० तर दहेगाव गोसावी येथील ११ जणांना सुरक्षित ठिकण असलेल्या अंगणवाडीत हलविण्यात आले होते. सदर व्यक्तींना संभाव्य धोका लक्षात घेवून रात्र अंगणवाडीत काढावी लागली. जिल्ह्यात २७१०.७३ मिमी पाऊस झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली असून जिल्ह्यात अतिवृष्टीच झाल्याचे तसेच सध्या परिस्थिती सामान्य असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.५ हजार ७६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानसमुद्रपूर तालुक्यातील ५ हजार ७६५ हेक्टरवरील शेत पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी व सेलू तालुक्यातील किती हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले याची नोंद जिल्हा प्रशासनाने सध्या घेतली नसल्याचे सांगण्यात येते, हे विशेष.उपराजधानीतील अधिकाऱ्यांना दिली जातेय माहितीजिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी पूर परिस्थिती व पावसाची माहिती घेवून ती नागपूर येथील संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्यावतीने दिली जात आहे. शिवाय त्यांच्याकडून दिल्या जाणाºया सुचनाचे पालन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातील आपत्ती निवारण कक्षाचे कर्मचारी करीत असल्याचे सांगण्यात आले.पुरात अडकलेल्या १५ जणांना काढले सुखरूप बाहेरपुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील टिकाराम मुडे (४२), विनोद आत्राम (२५), सुरेखा आत्राम (२१), पुरुषोत्तम आत्राम (२३) व अजय आत्राम (०१) यांच्यासह समुद्रपूर तालुक्यात शेडगाव आदजा शिवारातील पटेल यांच्या डेरीफार्म मध्ये पुराच्या वाढत्या पाण्यामुळे अडकलेल्या दहा मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.