शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:28 IST

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरांसह गोठ्यांचेही नुकसान : संभाव्य धोक्यामुळे शेकडो कुटुंबीयांना हलविले होते सुरक्षित ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका समुद्रपूर तालुक्याला बसल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण कक्षाने घेतली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी ७७ घरांसह १२ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम होता. त्यानंतर पावसाने काहीशी उघाड दिली आहे. गुरूवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जलाशयांच्या पाण्याच्या पातळीवर वाढ झाली आहे. शिवाय सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने याचा परिणाम समुद्रपूर तालुक्यातील १६८ गावातील १०९ कुटुंबियांवर झाला. पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने हमदापूर येथील १६, सिंदी (रेल्वे) येथील ५० तर दहेगाव गोसावी येथील ११ जणांना सुरक्षित ठिकण असलेल्या अंगणवाडीत हलविण्यात आले होते. सदर व्यक्तींना संभाव्य धोका लक्षात घेवून रात्र अंगणवाडीत काढावी लागली. जिल्ह्यात २७१०.७३ मिमी पाऊस झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली असून जिल्ह्यात अतिवृष्टीच झाल्याचे तसेच सध्या परिस्थिती सामान्य असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.५ हजार ७६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसानसमुद्रपूर तालुक्यातील ५ हजार ७६५ हेक्टरवरील शेत पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी व सेलू तालुक्यातील किती हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले याची नोंद जिल्हा प्रशासनाने सध्या घेतली नसल्याचे सांगण्यात येते, हे विशेष.उपराजधानीतील अधिकाऱ्यांना दिली जातेय माहितीजिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी पूर परिस्थिती व पावसाची माहिती घेवून ती नागपूर येथील संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्यावतीने दिली जात आहे. शिवाय त्यांच्याकडून दिल्या जाणाºया सुचनाचे पालन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनातील आपत्ती निवारण कक्षाचे कर्मचारी करीत असल्याचे सांगण्यात आले.पुरात अडकलेल्या १५ जणांना काढले सुखरूप बाहेरपुराच्या पाण्यात अडकलेल्या एकूण १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील टिकाराम मुडे (४२), विनोद आत्राम (२५), सुरेखा आत्राम (२१), पुरुषोत्तम आत्राम (२३) व अजय आत्राम (०१) यांच्यासह समुद्रपूर तालुक्यात शेडगाव आदजा शिवारातील पटेल यांच्या डेरीफार्म मध्ये पुराच्या वाढत्या पाण्यामुळे अडकलेल्या दहा मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.