शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचा सर्वाधिक निधी साहित्य खरेदीवर खर्च; प्रशासक काळात चालला सावळागोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:03 IST

१५ व्या वित्त आयोगाचा निधी : ग्रामपंचायतींकडून साहित्य खरेदीवर निधीची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक असल्याने एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, अशीच अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींवरही प्रशासक असल्याने या ग्रामपंचायतींनीही कंत्राटदाराच्या मर्जीने कामे करून १५ वित्त आयोगाच्या निधीची उधळपट्टी केली आहे. प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींचा सर्वाधिक निधी साहित्य खरेदीवर खर्च झाला असून यात 'अर्धे तुम्ही अर्धे आम्ही' अशीच भूमिका राहिल्याने आता चर्चा व्हायला लागली आहे.

ग्रामपंचायतींना विकास कामांकरिता जनसुविधा, नागरी सुविधा, जिल्हा नियोजन समिती तसेच १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध होतो. १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या निधीची प्रशासक काळात उधळपट्टीच चालविल्याचे शासनाच्या ऑनलाइन प्रणालीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचयतींपैकी तब्बल ५०७ ग्रामपंचायती 'पीएफएमएस' प्रणालीशी संलग्न असल्याने कोणत्या ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणती कामे केली, त्यासाठी किती निधी खर्च केला हे एका क्लिकवर उपलब्ध होते. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वस्तू खरेदीवर जोर दिला असून लाखो रुपयांची देयके काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे हा निधी पाण्यात जाणारा असल्याने गावकऱ्यांनी याकडे लक्ष देत हिशेब मागण्याची वेळ आली आहे.

जेम पोर्टल ठरलेय कुरण....कोणत्याही कामाच्या निविदा काढल्या तर त्यामध्ये स्पर्धा होऊन कमी किमतीत चांगले काम होण्याची शक्यता असते. पण, अलीकडे जेम (जेईएम) पोर्टलवरूनच निविदा न करता कंत्राटदार कामे करीत असून त्याला अधिकाऱ्यांचीही साथ आहे. परिणामी तांत्रिक कामेही थेट जेम पोर्टलवरून व्हायला लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्या प्रशासक काळात याच पोर्टलवरून मनमर्जी कामे केली जात असल्याने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकरिता ही प्रणाली कुरण ठरत असल्याचे दिसून येत आहे.

मर्जीतील कंत्राटदारांनाच दिलेय बहुतांश कामजिल्ह्यातील एकूण ५१९ ग्रामपंचायतींपैकी ५०८ ग्रामपंचायतींमध्ये १५ व्या वित्त आयोगातून १३ हजार ५९३ कामे करण्यात आली. यातून रस्ता व नाली बांधकाम यासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांपेक्षा साहित्य खरेदीवरच अधिक खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेषत साहित्य पुरविणाऱ्या एजन्सीही मर्जीतीलच असल्याने साऱ्यांचच चांगभलं होत आहे.

पोर्टलवरच वाढीव दर निश्चिती, त्यानुसारच काढलीय देयकेजेम पोर्टलवर साहित्याचे आधीच वाढीच दर निश्चित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच दराच्या आधारे ग्रामपंचायतींकडून देयकही काढण्यात आले आहे. ज्या साहित्याची मुळ किंमत १२ ते १५ हजार असेल तेच साहित्य ३९ ते ४० हजार रुपयांत कंत्राटदाराने माथी मारले व ग्रामपंचायतींनी देयकही दिले. यावरुन दामदुप्पट आणि दर्जाहिन साहित्याच्या पुरवठा केला जात असल्याचीही ओरड आता गावकरी करायला लागल आहे. याही दृष्टीने चौकशीची गरज आहे.

६६.८० कोटींचा निधी १५ वित्त आयोगातून वर्षभरात खर्चजिल्ह्यातील ५०८ ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाचा ६६ कोटी ८० लाख ३५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

या साहित्याची केलीय खरेदी...१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरण कक्ष, कचरा गाड्या, नॅपकीन मशीन, कचरा कुंड्या, बेंच खरेदी, आरो फिल्टर, एलइडी लाइट, संगणक दुरुस्ती, फॉगिंग मशीन, पंपिंग मशीन, फर्निचर, पाळणा खरेदी, आरो बसविणे, ओपन जीम, आऊट डोअर जीम, कंपोस्ट हंट, सीसीटीव्ही, खेळणी, सोलर पॅनल, हायमास्ट यावर खरेदी केला आहे. विशेषतः प्रशासक असलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये साहित्य नसतानाही देयक काढल्याचे माहिती पुढे आली आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धाgram panchayatग्राम पंचायत