शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींचा सर्वाधिक निधी साहित्य खरेदीवर खर्च; प्रशासक काळात चालला सावळागोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:03 IST

१५ व्या वित्त आयोगाचा निधी : ग्रामपंचायतींकडून साहित्य खरेदीवर निधीची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक असल्याने एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, अशीच अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींवरही प्रशासक असल्याने या ग्रामपंचायतींनीही कंत्राटदाराच्या मर्जीने कामे करून १५ वित्त आयोगाच्या निधीची उधळपट्टी केली आहे. प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींचा सर्वाधिक निधी साहित्य खरेदीवर खर्च झाला असून यात 'अर्धे तुम्ही अर्धे आम्ही' अशीच भूमिका राहिल्याने आता चर्चा व्हायला लागली आहे.

ग्रामपंचायतींना विकास कामांकरिता जनसुविधा, नागरी सुविधा, जिल्हा नियोजन समिती तसेच १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध होतो. १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने या निधीची प्रशासक काळात उधळपट्टीच चालविल्याचे शासनाच्या ऑनलाइन प्रणालीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५१९ ग्रामपंचयतींपैकी तब्बल ५०७ ग्रामपंचायती 'पीएफएमएस' प्रणालीशी संलग्न असल्याने कोणत्या ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणती कामे केली, त्यासाठी किती निधी खर्च केला हे एका क्लिकवर उपलब्ध होते. यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वस्तू खरेदीवर जोर दिला असून लाखो रुपयांची देयके काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे हा निधी पाण्यात जाणारा असल्याने गावकऱ्यांनी याकडे लक्ष देत हिशेब मागण्याची वेळ आली आहे.

जेम पोर्टल ठरलेय कुरण....कोणत्याही कामाच्या निविदा काढल्या तर त्यामध्ये स्पर्धा होऊन कमी किमतीत चांगले काम होण्याची शक्यता असते. पण, अलीकडे जेम (जेईएम) पोर्टलवरूनच निविदा न करता कंत्राटदार कामे करीत असून त्याला अधिकाऱ्यांचीही साथ आहे. परिणामी तांत्रिक कामेही थेट जेम पोर्टलवरून व्हायला लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्या प्रशासक काळात याच पोर्टलवरून मनमर्जी कामे केली जात असल्याने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकरिता ही प्रणाली कुरण ठरत असल्याचे दिसून येत आहे.

मर्जीतील कंत्राटदारांनाच दिलेय बहुतांश कामजिल्ह्यातील एकूण ५१९ ग्रामपंचायतींपैकी ५०८ ग्रामपंचायतींमध्ये १५ व्या वित्त आयोगातून १३ हजार ५९३ कामे करण्यात आली. यातून रस्ता व नाली बांधकाम यासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांपेक्षा साहित्य खरेदीवरच अधिक खर्च करण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेषत साहित्य पुरविणाऱ्या एजन्सीही मर्जीतीलच असल्याने साऱ्यांचच चांगभलं होत आहे.

पोर्टलवरच वाढीव दर निश्चिती, त्यानुसारच काढलीय देयकेजेम पोर्टलवर साहित्याचे आधीच वाढीच दर निश्चित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच दराच्या आधारे ग्रामपंचायतींकडून देयकही काढण्यात आले आहे. ज्या साहित्याची मुळ किंमत १२ ते १५ हजार असेल तेच साहित्य ३९ ते ४० हजार रुपयांत कंत्राटदाराने माथी मारले व ग्रामपंचायतींनी देयकही दिले. यावरुन दामदुप्पट आणि दर्जाहिन साहित्याच्या पुरवठा केला जात असल्याचीही ओरड आता गावकरी करायला लागल आहे. याही दृष्टीने चौकशीची गरज आहे.

६६.८० कोटींचा निधी १५ वित्त आयोगातून वर्षभरात खर्चजिल्ह्यातील ५०८ ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाचा ६६ कोटी ८० लाख ३५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

या साहित्याची केलीय खरेदी...१५ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरण कक्ष, कचरा गाड्या, नॅपकीन मशीन, कचरा कुंड्या, बेंच खरेदी, आरो फिल्टर, एलइडी लाइट, संगणक दुरुस्ती, फॉगिंग मशीन, पंपिंग मशीन, फर्निचर, पाळणा खरेदी, आरो बसविणे, ओपन जीम, आऊट डोअर जीम, कंपोस्ट हंट, सीसीटीव्ही, खेळणी, सोलर पॅनल, हायमास्ट यावर खरेदी केला आहे. विशेषतः प्रशासक असलेल्या काही ग्रामपंचायतीमध्ये साहित्य नसतानाही देयक काढल्याचे माहिती पुढे आली आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धाgram panchayatग्राम पंचायत