शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बहुतांश एटीएम अद्याप ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:25 IST

नोटाबंदीनंतर फार मोठा कालावधी लोटूनदेखील शहरातील बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च असल्याने शोभेचे ठरत आहेत. यात व्यवहारात अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

ठळक मुद्देव्यवहारात अडचणी : ग्राहकांच्या नशिबी भटकंतीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोटाबंदीनंतर फार मोठा कालावधी लोटूनदेखील शहरातील बहुतांश एटीएम ‘कॅशलेस’च असल्याने शोभेचे ठरत आहेत. यात व्यवहारात अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहेत.शहरात राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे ७५ च्या जवळपास एटीएम केंद्र आहे. मात्र, बहुतांश एटीएम केंद्रांना अद्यापही ‘नो कॅश’चे ग्रहण लागलेले दिसून येते. परिणामी, ग्राहकांची या एटीएमवरून त्या एटीएमवर अशी भटकंती पहायला मिळते. यात पेट्रोलची नासाडी होतेच, मनस्तापही सहन करावा लागतो. कुठल्याही एटीएम केंद्रात गेले तरी खडखडाटच दिसून येत असल्याने ग्राहक संबंधित बँक व्यवस्थापन, एजन्सीविषयी संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. एखाद्या एटीएम केंद्रात पैसे उपलब्ध असतील तर ग्राहकाला हवे असलेले चलन-शंभर, दोनशेच्या नोटा मिळत नाही. शहरात बँक आॅफ इंडियाचे सहा ते सात एटीएम केंद्र आहेत. मात्र बहुतांशवेळी यातील एकच एटीएम सुरू असते. याशिवाय अन्य केंद्रांवरही नो कॅशचे फलक सदैव झळकताना दिसतात. यामुळे मागील काही दिवसांपासून सर्वच बँकांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. असे असताना काही बँकांत अतिरिक्त खिडकीदेखील सुरू केली जात नाही. यामुळे तासन्तास बँकेतच ताटकळत राहावे लागत असल्याने पेन्शनची रक्कम घेण्याकरिता आलेल्या वयोवृद्धांना मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना कधीही सौजन्याची वागणूक दिली जात नाही. बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत ग्राहकांना या बाबीचा वेळोवेळी प्रत्यय येतो. शाब्दिक वाद येथे नेहमी पाहायला मिळतो. याविषयी अनेकदा शाखा व्यवस्थापक, विभागीय कार्यालयाकडे तक्रारी केल्या जातात, मात्र त्यांच्याकडूनही या प्रकारावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न केला जातो. एटीएमची मोठी संख्या असतानादेखील बोटावर मोजण्याइतपतच सुरू राहत असल्याने शोभेचे ठरताना दिसत आहेत. नोटाबंदीनंतर फार मोठा काळ लोटूनही आर्थिक घडी विस्कटलेलीच दिसून येत आहे. यात सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे लावे लागत आहे.वातानुकूलित यंत्रणाही बंदचअनेक एटीएममधील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने शोभेचीच ठरत असतानाच काही एटीएममध्ये ही यंत्रणाच अस्तित्वात नाही. त्यामुळे सर्व्हर डाऊन होणे व अन्य तांत्रिक बिघाड निर्माण होणे, या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.केंद्रांची सुरक्षाही वाऱ्यावरशहरात एटीएम केंद्रांची संख्या मोठी असून सुविधांचा अभाव कायम आहे. निम्म्यापेक्षा अधिक केंद्रात सुरक्षारक्षक नसल्याने एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. शिवाय केंद्राची दारेही पूर्णत: बंद होत नसल्याने रात्री आणि दिवसा अनेक केंद्रांमध्ये मोकाट कुत्री, शेळ्या बसलेल्या आढळून येतात. मात्र, कुठल्याही उपाययोजना बँक व्यवस्थापनांकडून केल्या जात नाहीत. प्रत्येक केंद्रावर सुरक्षारक्षक नियुक्तीची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.