शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:18 IST

मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनवनीत देशमुख : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा धुडगूस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू पाहात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात धुडगूस घातला आहे. जेवढे जास्त शुल्क तेवढी चांगली शाळा, असे समीकरण झाले आहे. सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांचा नूर बघण्यासारखा अन् सामान्य मराठी माणसाला बोटे तोंडात घालायला लावणारा असा आहे.बाह्यस्वरूप एकदम चकचकीत. आज देखावाञ महत्त्वाचा झाला आहे. या तुलनेत मराठी शाळा कुठेही बसत नाहीत आणि पुढे जायचं असेल तर मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे जाता येणार नाही, ही धास्ती. शाळांमधून ग्रंथालये हद्दपार झाली आहेत. आमचा इतिहास, आमची संस्कृती याचा विचार आणि अभ्यास जाणून घ्यायला वेळ कुठे आहे? मोबाइल, इंटरनेट या तंत्रज्ञानाने माणसाला यंत्रवत बनवले आहे आयुष्य गतिमान झालं आहे. पळापळा, कोण पुढे पळतो, अशी शर्यत सुरू आहे. लहान-लहान मुलंही मोबाईल हाताळतात. आईवडील कौतुकानं सांगतात. मराठी भाषेविषयी मराठी माणूसच उदासीन आहे. ५ हजारांचा मोबाईल मुलांना घेऊन देऊ शकतो; पण शंभर रुपयांचं पुस्तक घेऊन देणार नाही. मराठी साहित्यात एम. ए झालेल्या तरुणाला सहज विचारलं, पानिपत वाचली काय? तो माझ्याकडे बघतच राहिला. काही वेळाने त्यानं विचारलं, काय आहे पानिपत? डिग्रीला महत्त्व आहे. म्हणून डिग्री कशी पदरात पाडून घ्यायची, ही मानसिकता तयार झाली आहे. इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर, शिक्षक यापैकी किती लोकांना सानेगुरुजी माहीत नाहीत. वि. स. खांडेकर, प्र.के. अत्रे माहीतच नाहीत. त्यांची पुस्तके वाचणे तर दूरच. असा अनुभव अनेकदा येतो. वाचनाची प्रक्रियाच शाळामधून बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो.ज्या दिवशी प्रत्येकाच्या हातात पुस्तक दिसू लागेल, ते दिवस विकासाचे असतील. हा विकास असेल व्यक्तिमत्त्वाचा, संस्कृतीच्या विकासाचा, देशाच्या अन् राष्ट्राच्या विकासाचा. मुख्यमंत्र्यांनी मराठी सर्व शाळांसाठी बंधनकारक असेल, असे आपल्या भाषणातून कोल्हापूरला सांगितले आहे. त्यामुळे मराठी भाषेला सोनियाचे दिवस पुन्हा पाहता येतील काय?शाळांतील ग्रंथालयांचे अनुदान बंदशाळा, कॉलेजला ग्रं्रथालयात ग्रंथ खरेदीसाठी शासनाकडून अनुदान बंद आहे. परिणामी, ग्रंथपाल, पुस्तके शाळांमध्ये नाही. ज्या समाजाची, देशाची वाचन क्षमता क्षीण होते, त्या समाजात, देशात विकास क्षमता नष्ट होते आणि समाज अधोगतीकडे जातो.