शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

राजभाषा मराठीची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:18 IST

मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनवनीत देशमुख : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा धुडगूस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठी महाराष्ट्रात राजभाषा जरी असली तरी या राजभाषेची अवहेलना महाराष्ट्रातच अधिक होते आहे, ही अतिशय लाजिरवाणी बाब होय, असे मत साहित्यिक व कवी प्रा. नवनीत देशमुख यांनी व्यक्त केली.आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू पाहात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी महाराष्ट्रात धुडगूस घातला आहे. जेवढे जास्त शुल्क तेवढी चांगली शाळा, असे समीकरण झाले आहे. सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांचा नूर बघण्यासारखा अन् सामान्य मराठी माणसाला बोटे तोंडात घालायला लावणारा असा आहे.बाह्यस्वरूप एकदम चकचकीत. आज देखावाञ महत्त्वाचा झाला आहे. या तुलनेत मराठी शाळा कुठेही बसत नाहीत आणि पुढे जायचं असेल तर मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे जाता येणार नाही, ही धास्ती. शाळांमधून ग्रंथालये हद्दपार झाली आहेत. आमचा इतिहास, आमची संस्कृती याचा विचार आणि अभ्यास जाणून घ्यायला वेळ कुठे आहे? मोबाइल, इंटरनेट या तंत्रज्ञानाने माणसाला यंत्रवत बनवले आहे आयुष्य गतिमान झालं आहे. पळापळा, कोण पुढे पळतो, अशी शर्यत सुरू आहे. लहान-लहान मुलंही मोबाईल हाताळतात. आईवडील कौतुकानं सांगतात. मराठी भाषेविषयी मराठी माणूसच उदासीन आहे. ५ हजारांचा मोबाईल मुलांना घेऊन देऊ शकतो; पण शंभर रुपयांचं पुस्तक घेऊन देणार नाही. मराठी साहित्यात एम. ए झालेल्या तरुणाला सहज विचारलं, पानिपत वाचली काय? तो माझ्याकडे बघतच राहिला. काही वेळाने त्यानं विचारलं, काय आहे पानिपत? डिग्रीला महत्त्व आहे. म्हणून डिग्री कशी पदरात पाडून घ्यायची, ही मानसिकता तयार झाली आहे. इंजिनिअर, डॉक्टर, प्रोफेसर, शिक्षक यापैकी किती लोकांना सानेगुरुजी माहीत नाहीत. वि. स. खांडेकर, प्र.के. अत्रे माहीतच नाहीत. त्यांची पुस्तके वाचणे तर दूरच. असा अनुभव अनेकदा येतो. वाचनाची प्रक्रियाच शाळामधून बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो.ज्या दिवशी प्रत्येकाच्या हातात पुस्तक दिसू लागेल, ते दिवस विकासाचे असतील. हा विकास असेल व्यक्तिमत्त्वाचा, संस्कृतीच्या विकासाचा, देशाच्या अन् राष्ट्राच्या विकासाचा. मुख्यमंत्र्यांनी मराठी सर्व शाळांसाठी बंधनकारक असेल, असे आपल्या भाषणातून कोल्हापूरला सांगितले आहे. त्यामुळे मराठी भाषेला सोनियाचे दिवस पुन्हा पाहता येतील काय?शाळांतील ग्रंथालयांचे अनुदान बंदशाळा, कॉलेजला ग्रं्रथालयात ग्रंथ खरेदीसाठी शासनाकडून अनुदान बंद आहे. परिणामी, ग्रंथपाल, पुस्तके शाळांमध्ये नाही. ज्या समाजाची, देशाची वाचन क्षमता क्षीण होते, त्या समाजात, देशात विकास क्षमता नष्ट होते आणि समाज अधोगतीकडे जातो.