शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा अधिक, तुलनेत कामांची गती संथ

By admin | Updated: October 31, 2015 03:04 IST

महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, ...

वर्धा : महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. प्रथमदर्शी, तसे चित्रही निर्माण झाले होते. अनेक योजनांच्या घोषणा झाल्या, काही थेट लाभाच्या योजनांचा नागरिकांना फायदाही होत आहे; पण प्रत्यक्ष विकास कामांची गती मात्र पाहिजे त्या वेगाने धावताना दिसत नाही. विकास कामे होतच नाहीत, अशातला भाग नाही; पण त्याचा वेग मंदावल्याचेच दिसते.वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी भाजपला अर्धा कौल दिला. एक खासदार आणि दोन आमदार भाजपाच्या पदरात टाकले तर दोन जागा काँगे्रसकडे राहिल्या. असे असले तरी भाजप सरकारने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या अपेक्षांचे ओझे टाकले. त्यांनीही तो भार सहज पेलत विकास कामे हाती घेतली. वर्धा जिल्ह्याकरिता अनेक घोषणा करण्यात आल्या. यातील प्रत्येक काम प्रत्यक्षात साकार होताना दिसत नसले तरी अनेक कामांना सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनाची सोय, सौर ऊर्जेवरील कृषी पंप, विद्युत कृषी पंपांना निधी, बसस्थानकाचे नुतनीकरण, सेवाग्राम विकास आराखड्याला मूर्त रूप, कुटीर उद्योगांना चालना, शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण, रस्ते-पुलांची निर्मिती यासह अनेक घोषणा झाल्या. यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. सौर ऊर्जेवरील कृषी पंपांची योजनाही राबविली जात आहे; पण अन्य योजनांचा अद्याप हात घालण्यात आलेला नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे हाती घेऊन निधीची मंजुरी दिली गेली; पण प्रत्यक्ष निधी प्राप्त न झाल्याने अनेक कामे रखडल्याचे अधिकारी सांगतात. सेवाग्राम विकास आराखड्याचे प्रारूप नव्याने तयार केले जात असल्याने मूर्त रूप प्राप्त होण्यास वेळच लागणार आहे. यासाठी निधी आरक्षित असला तरी प्रारूपच तयार नसल्याने सध्या केवळ बैठकाच होत असल्याचे दिसते. भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणूक काळात दाखविलेली स्वप्ने पूर्ण करेल, अशी वातावरण निर्मिती झाली होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे अनेक घोषणांवरून दिसते; पण प्रत्यक्ष कामांना हात घातला जात नसल्याने प्रश्नचिन्हच निर्माण होत असल्याचे दिसते. केवळ वर्धा जिल्ह्यापुरता विचार केला तरी शासनाची अनेक कामे व योजना प्रलंबितच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी दोन आमदार व पालकमंत्री प्रयत्न करीत असले तरी घोषणांतील योजना प्रत्यक्ष साकार होण्याला महत्त्व आहे. या दृष्टीने शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, हे येत्या काळात दिसेलच!(कार्यालय प्रतिनिधी)