शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

घोषणा अधिक, तुलनेत कामांची गती संथ

By admin | Updated: October 31, 2015 03:04 IST

महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, ...

वर्धा : महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. प्रथमदर्शी, तसे चित्रही निर्माण झाले होते. अनेक योजनांच्या घोषणा झाल्या, काही थेट लाभाच्या योजनांचा नागरिकांना फायदाही होत आहे; पण प्रत्यक्ष विकास कामांची गती मात्र पाहिजे त्या वेगाने धावताना दिसत नाही. विकास कामे होतच नाहीत, अशातला भाग नाही; पण त्याचा वेग मंदावल्याचेच दिसते.वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी भाजपला अर्धा कौल दिला. एक खासदार आणि दोन आमदार भाजपाच्या पदरात टाकले तर दोन जागा काँगे्रसकडे राहिल्या. असे असले तरी भाजप सरकारने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या अपेक्षांचे ओझे टाकले. त्यांनीही तो भार सहज पेलत विकास कामे हाती घेतली. वर्धा जिल्ह्याकरिता अनेक घोषणा करण्यात आल्या. यातील प्रत्येक काम प्रत्यक्षात साकार होताना दिसत नसले तरी अनेक कामांना सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनाची सोय, सौर ऊर्जेवरील कृषी पंप, विद्युत कृषी पंपांना निधी, बसस्थानकाचे नुतनीकरण, सेवाग्राम विकास आराखड्याला मूर्त रूप, कुटीर उद्योगांना चालना, शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण, रस्ते-पुलांची निर्मिती यासह अनेक घोषणा झाल्या. यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. सौर ऊर्जेवरील कृषी पंपांची योजनाही राबविली जात आहे; पण अन्य योजनांचा अद्याप हात घालण्यात आलेला नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे हाती घेऊन निधीची मंजुरी दिली गेली; पण प्रत्यक्ष निधी प्राप्त न झाल्याने अनेक कामे रखडल्याचे अधिकारी सांगतात. सेवाग्राम विकास आराखड्याचे प्रारूप नव्याने तयार केले जात असल्याने मूर्त रूप प्राप्त होण्यास वेळच लागणार आहे. यासाठी निधी आरक्षित असला तरी प्रारूपच तयार नसल्याने सध्या केवळ बैठकाच होत असल्याचे दिसते. भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणूक काळात दाखविलेली स्वप्ने पूर्ण करेल, अशी वातावरण निर्मिती झाली होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे अनेक घोषणांवरून दिसते; पण प्रत्यक्ष कामांना हात घातला जात नसल्याने प्रश्नचिन्हच निर्माण होत असल्याचे दिसते. केवळ वर्धा जिल्ह्यापुरता विचार केला तरी शासनाची अनेक कामे व योजना प्रलंबितच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी दोन आमदार व पालकमंत्री प्रयत्न करीत असले तरी घोषणांतील योजना प्रत्यक्ष साकार होण्याला महत्त्व आहे. या दृष्टीने शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, हे येत्या काळात दिसेलच!(कार्यालय प्रतिनिधी)