शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

घोषणा अधिक, तुलनेत कामांची गती संथ

By admin | Updated: October 31, 2015 03:04 IST

महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, ...

वर्धा : महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारची शनिवारी वर्षपूर्ती होत आहे. सत्ताबदल झाल्यास विकासाची चक्रे वेगाने फिरतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. प्रथमदर्शी, तसे चित्रही निर्माण झाले होते. अनेक योजनांच्या घोषणा झाल्या, काही थेट लाभाच्या योजनांचा नागरिकांना फायदाही होत आहे; पण प्रत्यक्ष विकास कामांची गती मात्र पाहिजे त्या वेगाने धावताना दिसत नाही. विकास कामे होतच नाहीत, अशातला भाग नाही; पण त्याचा वेग मंदावल्याचेच दिसते.वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी भाजपला अर्धा कौल दिला. एक खासदार आणि दोन आमदार भाजपाच्या पदरात टाकले तर दोन जागा काँगे्रसकडे राहिल्या. असे असले तरी भाजप सरकारने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वर्धा जिल्ह्याच्या अपेक्षांचे ओझे टाकले. त्यांनीही तो भार सहज पेलत विकास कामे हाती घेतली. वर्धा जिल्ह्याकरिता अनेक घोषणा करण्यात आल्या. यातील प्रत्येक काम प्रत्यक्षात साकार होताना दिसत नसले तरी अनेक कामांना सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सिंचनाची सोय, सौर ऊर्जेवरील कृषी पंप, विद्युत कृषी पंपांना निधी, बसस्थानकाचे नुतनीकरण, सेवाग्राम विकास आराखड्याला मूर्त रूप, कुटीर उद्योगांना चालना, शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण, रस्ते-पुलांची निर्मिती यासह अनेक घोषणा झाल्या. यातील जलयुक्त शिवार अभियानाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. सौर ऊर्जेवरील कृषी पंपांची योजनाही राबविली जात आहे; पण अन्य योजनांचा अद्याप हात घालण्यात आलेला नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक कामे हाती घेऊन निधीची मंजुरी दिली गेली; पण प्रत्यक्ष निधी प्राप्त न झाल्याने अनेक कामे रखडल्याचे अधिकारी सांगतात. सेवाग्राम विकास आराखड्याचे प्रारूप नव्याने तयार केले जात असल्याने मूर्त रूप प्राप्त होण्यास वेळच लागणार आहे. यासाठी निधी आरक्षित असला तरी प्रारूपच तयार नसल्याने सध्या केवळ बैठकाच होत असल्याचे दिसते. भाजप सत्तेत आल्यानंतर निवडणूक काळात दाखविलेली स्वप्ने पूर्ण करेल, अशी वातावरण निर्मिती झाली होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे अनेक घोषणांवरून दिसते; पण प्रत्यक्ष कामांना हात घातला जात नसल्याने प्रश्नचिन्हच निर्माण होत असल्याचे दिसते. केवळ वर्धा जिल्ह्यापुरता विचार केला तरी शासनाची अनेक कामे व योजना प्रलंबितच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यासाठी दोन आमदार व पालकमंत्री प्रयत्न करीत असले तरी घोषणांतील योजना प्रत्यक्ष साकार होण्याला महत्त्व आहे. या दृष्टीने शासनाकडून कोणती पावले उचलली जातात, हे येत्या काळात दिसेलच!(कार्यालय प्रतिनिधी)