शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

१२० गावांच्या यादीवर तब्बल ५० आक्षेप

By admin | Updated: April 21, 2017 01:51 IST

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचा अध्यादेश निर्गमित झाला त्या काळापासूनच बदल्यांवरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले.

जि.प. शिक्षकांच्या बदल्या : अवघड गावावरून वाद रूपेश खैरी   वर्धा जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांचा अध्यादेश निर्गमित झाला त्या काळापासूनच बदल्यांवरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. यंदाच्या सत्रात गावांची निवड करताना अवघड आणि सर्वसाधारण गाव अशी संज्ञा वापरण्यात येत आहे. यामुळे या गावांची व्याख्या कशी करावी यावरून शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ माजला आहे. अशात शिक्षण विभागाने १२० गावांची यादी तयार करून ती प्रसिद्ध केली; मात्र या यादीवर तब्बल ५० आक्षेप आल्याने ती यादी आता नव्याने तयार करण्यात येणार आहे. परिणामी बदल्यांचे काम पुनहा रेंगाळणार असण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा असलेल्या तब्बल १२० गावांना अवघड यादीत टाकण्यात आले. तर उर्वरीत सुमारे ७८० गावांना सर्वसाधारण गावात टाकण्यात आले. यामुळे काहींकडून या यादीवर आक्षेप घेण्यात आले. तसे नवे ५० अर्ज आले असून त्यात उल्लेख करण्यात आलेल्या पूर्णच गावांना या यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या कक्षात नव्याने बैठक आयोजित आहे. यात जर या गावांची निवड झाली तर ही ५० गावे नव्या यादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. सध्या अंमलात येत असलेली बदलीची प्रक्रिया अयोग्य असल्याचे काही शिक्षक संघटनांकडून बोलल्या जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षक संघाच्यावतीने राज्यभर एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दुसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येत आहे. तर शिक्षण समितीकडून बदल्यांसह रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे. या शिक्षण संघटनांच्या विरोधात अवघड गावे ठरविताना शिक्षण विभागाची अडचण होत आहे. ही गावे ठरविताना साधारणत: या गावात अवागमनाचे साधन, तिथे असलेली शाळेची स्थिती, मुख्यालयापासूनचे अंतर याचा विचार करण्यात येत आहेत. तर सर्वसाधारण गावे आहे त्याच प्रकारात राहणार आहेत. यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून १२० अवघड गावांची यादी तयार केली होती. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण १ हजार ५०७ शाळा आहेत. यात काही गावात दोन शाळा आहेत. यामुळे यंदाच्या सत्रात शासनाच्या नियमानुयार कालावधी झालेल्या तब्बल ९०० गावांतील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या ९०० गावांपैकी १२० गावे अवघड यादीत टाकण्यात आले आहेत. तर ७८० गावे सर्वसाधारण यादीत येणार असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात या सर्वसाधारण गावात अनेक शिक्षक २० ते ३० वर्षांपासून कार्यरत असल्याचे दिसून आले आहे, यामुळे त्यांची अवघड गावात बदली करण्यासंदर्भात शिक्षण विभागात हालचाली सुरू असल्याचे दिसून आले आहेत. तर अवघड गावातील सेवाकाळ संपलेल्या शिक्षकांना सर्वसाधारण गावात आणण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चांगलीच गरमागरमी सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले आहे. अवघड यादीत समाविष्ट गावातील सर्वच जागा भरणार साधारणत: अवघड गावांत जाण्यास शिक्षक तयार नसल्याचे दिसते आहे. असे असले तरी अवघड गावांची यादी वाढली तरी त्या गावांतील जागा भरल्या जाणार आहे. अवघड गावातील एकही जागा रिक्त ठेवण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिक्षण विभागातील रिक्त पदांवर पदोन्नतीने वर्णी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या बदल्यांवरून वातावरण तापत आहे. जिल्ह्यात तब्बल २४ मुख्याध्यापक आणि २०० च्यावर विषय श्ािंक्षकांच्या जागा रिक्त असून या भरण्यासंदर्भातही जिल्हा परिषदेत हालचाली सुरू असल्याचे दिसून आले आहे. या रिक्त जागा पदोन्नतीने भरणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्यावतीने बदल्यांबाबत १२० गावे अवघड यादीत टाकले आहेत. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. ते आक्षेप स्वीकारण्यात आले असून या संदर्भात मुख्याधिकाऱ्याच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता उपस्थित राहणार आहे. या सर्वांत झालेल्या चर्चेअंती निकाल घेण्यात येतील. यात जर ५० आक्षेप मान्य झाल्यास या यादीतील गावांची संख्या वाढणार आहे. - किसन शेडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, वर्धा.