शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

दीड महिन्यांनी आली महावितरणाला जाग

By admin | Updated: May 22, 2016 01:51 IST

तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब शेतात आडवे झाले होते.

लोकमत वृत्ताची दखल : शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वासदेवळी : तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब शेतात आडवे झाले होते. परिणामी, लोंबकळत्या तारांमुळे धोका निर्माण झाला होता. याबाबत तक्रार देऊनही महावितरणला जाग आली नाही. याबाबत वृत्त प्रकाशित करताच मात्र महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले. दीड महिन्यानंतर गुरुवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली.सोनेगाव (बाई) गावाला दररोज महावितरणच्या हलगर्जीचा फटका बसत आहे. गत कित्येक वर्षापासून नागरिक त्रास सहन करीत आहेत. गावातील विजेच्या लपंडावाचा सामना करीत असतानाच शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू झाला होता. गावालगतचे वीज खांब वाकल्याने त्याच्या तारा लोंबकळत होत्या. इतकेच नव्हे तर खापर्डे नामक शेतकऱ्याच्या शेतातील एक खांब वाकल्याने तारा डोक्याला लागत होत्या. दरम्यान, वादळ झाल्याने तारांचे घर्षण होऊन शेतालगतचा भाग जळाला होता. यामुळे शेतकऱ्याने वीज कंपनीकडे तक्रार देत उपाययोजना करण्याची मागणी केली होती; पण तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. महिना-दीड महिना लोटूनही या तक्रारीकडे लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मशागतीची कामे खोळंबली होती. शेतकऱ्यांनी अभियंत्यांशी संपर्क साधला तर त्यांना उर्मट उत्तरे दिली जात होती. परिणामी, वाकलेले खांब शेतात आडवे झाल्याने शेतकऱ्यांनीच वीज पुरवठा खंडित केला. वीज पुरवठ्याअभावी परिसरातील पिके वाळली. जनावरांच्या पाण्याची समस्या निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या मशागतीचे कामेही खोळंबली. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून वृत्त प्रकाशित करण्यात आले. वृत्त उमटताच दीड महिन्याने महावितरणला जाग आली. अधिकाऱ्यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.शुक्रवारी सकाळपासून सोनगाव बाई व परिसरातील वाकलेले आणि पडलेले खांबे उभे करणे तसेच नवीन खांब बसविणे, तुटलेल्या तारा जोडण्याचे काम हाती घेण्यात आले. दीड महिन्यांपासून रखडलेली मशागतीची कामे आता होऊ शकणार असल्याने शेतकऱ्यांनाा मोठा दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)आता सर्वच काम ओके करून जातोएरवी शेतकरी व नागरिकांना टाळणारे महावितरणचे कर्मचारी वृत्त प्रकाशित होताच गावातच नव्हे तर शेताच्या बांधावर पोहोचले. सर्व परिस्थितीची माहिती घेऊन शेतकऱ्यांसमोरच कामाला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आणखी काय समस्या आहे, आताच सांगा, सर्व कामे ओके करुनच गावातून जातो, असेही कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना आश्वस्त केले; पण शेतातील खांबांच्या समस्येसोबतच गावातील विजेची समस्या ते सोडवतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील विजेच्या लपंडावाची समस्या निकाली काढली तर महावितरणचे नक्कीच आभार मानू, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.