शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पावसाळा संपला; रस्त्यावर खड्डे

By admin | Updated: November 1, 2014 23:12 IST

यंदा पावसाळा संपून महिना उलटला. रस्त्यांवरील खड्डे वाढल्याने अपघात वाढले आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डागडुजी सुरू केली नाही. याप्रकरणी नागरिकांनी

आष्टी (श़) : यंदा पावसाळा संपून महिना उलटला. रस्त्यांवरील खड्डे वाढल्याने अपघात वाढले आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डागडुजी सुरू केली नाही. याप्रकरणी नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार अमर काळे यांना निवेदन सादर करीत खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.तळेगाव-आष्टी-साहूर या राज्यमार्ग क्ऱ २४४ वर मोठे खड्डे पडले आहे. प्रवाशांना वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकी चालकांना मोठ्या वाहनांचा सामना करावा लागत आहे. खडकी-खंबीत-बेलोरा, नांदपूर-चिस्तूर-खडकी, आष्टी -थार-पार्डी, साहूर-माणिकवाडा, आष्टी-परसोडा रस्त्यांवर जागोजागी खड्डेच आहेत़ पावसामुळे रस्त्यांची चाळणी झाली़ दरवर्षी पावसाळ्यात खडी व मुरूमाने खड्डे बुजविले जात होते; पण यंदा निधी नसल्याचे सांगत बांधकाम विभागाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर खराब होत आहे. अनेक वाहनांना पंक्चरचाही फटका बसतो. अशावेळी गाडी दुरूस्त करण्यास वेळ खर्च करावा लागत आहे. खड्ड्यातून वाहन चालविताना ज्येष्ठ नागरिकांना पाठीचे, कमरेचे, मणक्याचे आजार वाढले आहेत़ तळेगावपासून ममदापूर गावापर्यंत खोल खड्डे पडले आहेत़ आष्टी गणेशपूर वॉर्डातही खड्डेच अधिक आहेत़ आष्टी-साहूर मार्गावर खड्डे वाढले आहेत़ धाडी ते साहूरपर्यंत खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकांचे नियंत्रण सुटते़ त्याची किंमत अपघातात चुकवावी लागते. परिवहन महामंडळाच्या भंगार बसेस खड्ड्यांमुळे पंक्चर होतात. दोन दिवसांपूर्वी धाडी घाटामध्ये एक बस पंक्चर झाल्याने प्रवासी सुमारे दोन तास ताटकळत होते. रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. आष्टी-परसोडा रस्त्याची स्थितीही गंभीर आहे. काळ्या मातीमुळे रस्ता दबला आहे. दोन किमी रस्त्यावरचे डांबर पूर्णत: निघाले आहे. आष्टी-थार-पार्डी रस्त्यावर घाटवळण आहे. चढावर खड्डे असल्याने वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागते़ या मार्गावरून दही, ताक, दूध, तूप आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते; पण खड्ड्यांमुळे अनेकदा सायकलस्वार आदळतात़ खड्ड्यांची अवस्था पाहून प्रत्येक प्रवासी वाहन कसे चालवायचे या प्रश्नावर निरूत्तर होतो़ सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार निवेदने सादर केलीत; पण दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेवटी नागरिकांनी आ़ अमर काळे यांना निवेदन सादर केले असून बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. गत अनेक दिवसांपासून रस्त्यांच्या कामांचा दर्जा घसरल्याने खड्ड्यांची डागडुजी झाली, असे वाटत नाही. बांधकाम विभाग तुटपुंजी निविदा काढून मोकळे होतात. कमी पैशात अधिक खड्डे बुजविण्याचे धोरण ठेवत असल्याने कामाची दर्जात्मक बांधणी करणेही कठिण झाल्याचे दिसते़ या सर्व बाबी विचारात घेऊन चांगल्या पद्धतीची कामे व्हावीत, अशी मागणीही नागरिकांनी आ. काळे यांना निवेदनातून केली आहे़(प्रतिनिधी)