शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारच्या कामांचे नियोजन करा

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना ..

अनुप कुमार : महसूलवाढीच्या उपाययोजनांचा घेतला आढावावर्धा : जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना गावातील सरपंच महसूल अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व समजावून सांगा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होतील, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी येथील जिल्हा यंत्रणेला दिल्या.विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महसूल वसुलीसंदर्भात दिलेल्या उद्दीेष्टांचा तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला.जिल्ह्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेताना अनूप कुमार यांनी जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टांपैकी गोळा झालेल्या महसूला संदर्भात समाधान व्यक्त केले. अद्यापपर्यंत उद्दीष्ट पूर्ण न केलेल्या तालुक्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही केली. मागेल त्याला शेततळे ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तालुकानिहाय नियोजन करावे व दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यानुसार काम करण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जि.प.च्या योजनांचाही घेतला आढावा वर्धा : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यावर झालेल्या उद्दिष्टांसंदर्भात विभागप्रमुखांकडून माहिती घेतली. कारंजा व आष्टी संपूर्ण तालुका निर्मल करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्यात.जिल्हा परिषदेतील प्रत्येक विषयाचा सखोल आढावा घेताना विभागांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करताना जलयुक्त शिवार योजना तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी विभागीय आयुक्त यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली. मागेल त्याला शेततळे ही योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवार, रविवारी प्रत्येक ंताालुक्यात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्याला असलेले २ हजार २४ शेततळ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)