शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारच्या कामांचे नियोजन करा

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना ..

अनुप कुमार : महसूलवाढीच्या उपाययोजनांचा घेतला आढावावर्धा : जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत यशस्वीपणे राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे गावात शिवारफेरी घेताना गावातील सरपंच महसूल अधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व समजावून सांगा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी सुरू होतील, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी येथील जिल्हा यंत्रणेला दिल्या.विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महसूल वसुलीसंदर्भात दिलेल्या उद्दीेष्टांचा तसेच जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला.जिल्ह्यासाठी महसूल गोळा करण्यासाठी दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेताना अनूप कुमार यांनी जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टांपैकी गोळा झालेल्या महसूला संदर्भात समाधान व्यक्त केले. अद्यापपर्यंत उद्दीष्ट पूर्ण न केलेल्या तालुक्यांनी विशेष मोहीम राबवावी, अशी सूचनाही केली. मागेल त्याला शेततळे ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तालुकानिहाय नियोजन करावे व दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यानुसार काम करण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जि.प.च्या योजनांचाही घेतला आढावा वर्धा : विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्यावर झालेल्या उद्दिष्टांसंदर्भात विभागप्रमुखांकडून माहिती घेतली. कारंजा व आष्टी संपूर्ण तालुका निर्मल करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्यात.जिल्हा परिषदेतील प्रत्येक विषयाचा सखोल आढावा घेताना विभागांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करताना जलयुक्त शिवार योजना तसेच मागेल त्याला शेततळे या योजनेचा प्रसार, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी विभागीय आयुक्त यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. तसेच विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यासंदर्भात माहिती दिली. मागेल त्याला शेततळे ही योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शनिवार, रविवारी प्रत्येक ंताालुक्यात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्याला असलेले २ हजार २४ शेततळ्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)