शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मनी हाय भाव आता ‘देवेंद्र’ आम्हा पाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:47 IST

जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होत ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी २४ व्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी उपोषण मंडपात ‘मनी हाय भाव, ‘देवेंद्र’ आम्हा पाव असे साकडे घालत एकापेक्षा एक भजनं सादर केली. शिवाय सरकारच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.

ठळक मुद्देकंत्राटदारांचे साकडे : साखळी उपोषणात भजनाने आणली रंगत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होत ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी २४ व्या दिवशी हे आंदोलन सुरूच होते. सोमवारी आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी उपोषण मंडपात ‘मनी हाय भाव, ‘देवेंद्र’ आम्हा पाव असे साकडे घालत एकापेक्षा एक भजनं सादर केली. शिवाय सरकारच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.सा.बा. विभाग व आदिवासी विभागामार्फत ईमारती, पुलांची कामे पूर्ण झाली. परंतु, तीन वर्षांपासून कंत्राटदारांची सहा कोटींची देयके अदा करण्यात आली नाही. ती तात्काळ अदा करण्यात यावी. जि.प. बांधकाम विभागाच्यावतीने २५१५ विशेष निधी अंतर्गत ४ कोटी ५२ लाख रुपयांची कामे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात पूर्ण करून घेण्यात आली आहे. परंतु, सदरचे देयक एक वर्षांपासून देण्यास टाळाटाळ होत आहे. जि.प. लघुसिंचन विभागामार्फत उमरी ता. कारंजा येथील तलावाचे काम पूर्ण करण्यात आले; पण तीन वर्षांपासून कंत्राटदारांचे देयक थकले आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झाली असताना वर्षभऱ्यापासून देयक देण्यात आलेली नाही. सदर देयके तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली.आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या कंत्राटदारांनी काळ्या फिती बांधून व काळे झेंडे झडकवून शासनाच्या कंत्राटदार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. तसेच विविध मागण्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली. आंदोलनात किशोर मिटकरी, मुन्ना झाडे, प्रणव जोशी, राजेश नासरे, रवी एकापुरे, राजेश हाडोळे, विजय घवघवे, प्रशांत घाटे, अमोल क्षीरसागर, बाबा जाकीर, हेमंत नरहरशेट्टीवार, संजय नंदनवार, सतीश बुरे, मनोज भुतडा, विजय लांबाडे, अंकुश दर्यापुरकर, नंदु थोरात, शशीकांत नायसे आदी सहभागी झाले होते.मागण्या मान्य होईपर्यंत लढा कायम ठेवणारन्यायिक मागण्यांसाठी मागील २३ दिवसांपासून कंत्राटदार आंदोलन करीत आहेत. सरकारने आंदोलनकर्त्यांची समस्या लक्षात घेता मागण्या मान्य कराव्या. सरकार लहान कंत्राटदारांवर अन्याय करीत असून बाहेरच्या कंत्राटदारांवर पैशाचा पाऊसच पाडत आहे. त्यांना कुठल्याही अटी व नियम लागू नाहीत. कंत्राटदारांवरील अन्याय संघटना खपवून घेणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहिल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष किशोर मिटकरी यांनी दिली.