शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: October 11, 2014 02:02 IST

मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले.

पुलगाव : मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले. यापुढेही भाव वाढण्याचे संकेत नाही. केवळ तीन महिन्यातच हा परिणाम दिसला तर पाच वर्षांत काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार न केलेलाच बरा, असा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी पुलगाव येथील काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभेत केला. ते म्हणाले, केंद्र सरकार चालविताना कुठलेही धोरणात्मक व जनतेच्या संदर्भातील विकासात्मक निर्णय, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्याचा अधिकार भाजपाच्या केंद्र सरकारला वापरता येताना दिसत नाही. ते वापरुही शकत नाही कारण मोदी सरकारचा रिमोट कंट्रोलच संघाच्या हाती आहे. ही मंडळी महाराष्ट्राला न्याय देणे तर दूरच वैदर्भीयांना न्याय देऊ शकणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नेहरू-गांधींजी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसला राष्ट्रमाता इंदिरा गांधींनी ताकद दिली. तर सोनियाजींनी आपल्या कर्तृत्वानी ही शक्ती भक्कम केली असून देशातील सर्व सामान्य माणसासमोर ६० वर्षातील कॉँग्रेसच्या विकासात्मक कामाचा आढावा आहे. मतदार कॉँग्रेसला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच बहुमतात सरकार स्थापन करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजीव गांधी जीवनदायी योजना अन्नाधान्य सुरक्षा विधेयक व इतर लोककल्याणकारी निर्णय केवळ कॉँग्रेस राजवटीतच होवू शकले. भाजपा सरकारने राज्यातील कास्तकारांच्या कापूस, सोयाबीन या उत्पादनाला हमी भाव न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसली. सत्तेचा हव्यास असलेल्या या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर रणजित कांबळे, ज्ञानेश्वर ढगे, चारूलता टोकस, विजय जायस्वाल, नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती. संचालन रामेश्वर वाघ यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)