शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: October 11, 2014 02:02 IST

मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले.

पुलगाव : मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले. यापुढेही भाव वाढण्याचे संकेत नाही. केवळ तीन महिन्यातच हा परिणाम दिसला तर पाच वर्षांत काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार न केलेलाच बरा, असा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी पुलगाव येथील काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभेत केला. ते म्हणाले, केंद्र सरकार चालविताना कुठलेही धोरणात्मक व जनतेच्या संदर्भातील विकासात्मक निर्णय, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्याचा अधिकार भाजपाच्या केंद्र सरकारला वापरता येताना दिसत नाही. ते वापरुही शकत नाही कारण मोदी सरकारचा रिमोट कंट्रोलच संघाच्या हाती आहे. ही मंडळी महाराष्ट्राला न्याय देणे तर दूरच वैदर्भीयांना न्याय देऊ शकणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नेहरू-गांधींजी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसला राष्ट्रमाता इंदिरा गांधींनी ताकद दिली. तर सोनियाजींनी आपल्या कर्तृत्वानी ही शक्ती भक्कम केली असून देशातील सर्व सामान्य माणसासमोर ६० वर्षातील कॉँग्रेसच्या विकासात्मक कामाचा आढावा आहे. मतदार कॉँग्रेसला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच बहुमतात सरकार स्थापन करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजीव गांधी जीवनदायी योजना अन्नाधान्य सुरक्षा विधेयक व इतर लोककल्याणकारी निर्णय केवळ कॉँग्रेस राजवटीतच होवू शकले. भाजपा सरकारने राज्यातील कास्तकारांच्या कापूस, सोयाबीन या उत्पादनाला हमी भाव न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसली. सत्तेचा हव्यास असलेल्या या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर रणजित कांबळे, ज्ञानेश्वर ढगे, चारूलता टोकस, विजय जायस्वाल, नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती. संचालन रामेश्वर वाघ यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)