शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

By admin | Updated: October 11, 2014 02:02 IST

मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले.

पुलगाव : मोदी सरकारने अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे भाव पाडले. यापुढेही भाव वाढण्याचे संकेत नाही. केवळ तीन महिन्यातच हा परिणाम दिसला तर पाच वर्षांत काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार न केलेलाच बरा, असा आरोप माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी पुलगाव येथील काँग्रेसच्या जाहीर प्रचार सभेत केला. ते म्हणाले, केंद्र सरकार चालविताना कुठलेही धोरणात्मक व जनतेच्या संदर्भातील विकासात्मक निर्णय, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्याचा अधिकार भाजपाच्या केंद्र सरकारला वापरता येताना दिसत नाही. ते वापरुही शकत नाही कारण मोदी सरकारचा रिमोट कंट्रोलच संघाच्या हाती आहे. ही मंडळी महाराष्ट्राला न्याय देणे तर दूरच वैदर्भीयांना न्याय देऊ शकणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नेहरू-गांधींजी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसला राष्ट्रमाता इंदिरा गांधींनी ताकद दिली. तर सोनियाजींनी आपल्या कर्तृत्वानी ही शक्ती भक्कम केली असून देशातील सर्व सामान्य माणसासमोर ६० वर्षातील कॉँग्रेसच्या विकासात्मक कामाचा आढावा आहे. मतदार कॉँग्रेसला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच बहुमतात सरकार स्थापन करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राजीव गांधी जीवनदायी योजना अन्नाधान्य सुरक्षा विधेयक व इतर लोककल्याणकारी निर्णय केवळ कॉँग्रेस राजवटीतच होवू शकले. भाजपा सरकारने राज्यातील कास्तकारांच्या कापूस, सोयाबीन या उत्पादनाला हमी भाव न देता त्यांच्या तोंडाला पाने पुसली. सत्तेचा हव्यास असलेल्या या मंडळींना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर रणजित कांबळे, ज्ञानेश्वर ढगे, चारूलता टोकस, विजय जायस्वाल, नगराध्यक्ष मनीष साहू, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती. संचालन रामेश्वर वाघ यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)