शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

मोदी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला

By admin | Updated: June 28, 2014 00:36 IST

सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे.

वर्धा : सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया यांनी केला आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत २०१४-१५ च्या खरीप हंगामासाठी शेतमालाच्या हमी भावाजी घोषणा केली आहे़ मोदी सरकारने धानाच्या हमी भावात ५० रूपये प्रती क्विंटल, कापसाच्या हमी भावात ५० रू़ क्विंटल ची वाढ केल्याचे जाहीर केले आहे़ २०१३-१४ च्या हंगामासाठी धानाचा हमी भाव १ हजार ३१० रू़ प्रति क्विंटलचा होता़ तो १ हजार ३६० रू़ जाहीर करण्यात आला आहे़ कापसाचा हमी भाव ४००० रू़ प्रति क्विंटलचा भाव होता तो ४ हजार ५० रू़ जाहीर करण्यात आला़ पण वास्तविक चित्र हे आहे की ही भाव वाढ निवडणुकीच्या पूर्वीच माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग सरकारने जाहीर केलेली आहे़प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या जाहीर सभेतून शेतकऱ्यांना खर्चावर ५० टक्के नफा हिशोबात घेवून भाव जाहीर करण्याचे वचन दिले होते़ त्याप्रमाणे धानाचा हमी भाव १ हजार ६८४ रू़ व कापसाचा हमी भाव ५ हजार १२० रू़ प्रती क्विंटल जाहीर करणे मोदी सरकारचे कर्तव्य आहे़ पण मोदी सरकारने डॉ़ मनमोहन सिंगच्या सरकारने जाहीर केलेलेच हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. डॉ़ मनमोहन सिंगजीच्या चुकींच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, असे प्रधानमंत्री मोदीजी म्हणायचे मग आता या घोषीत हमी भावात शेती नफ्याची होणार काय असा सवालही त्यांनी केला आहे.(शहर प्रतिनिधी)