शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

वादळात मोबाईलचा वापर धोक्याचा

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता.

वायगाव (नि़) : पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडल्याने जीवीत हानी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात अशा वेळी मोबाईलवर बोलणे टाळायणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात १३ जणांच्या अंगावार वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. जिल्ह्यातील ८ गावामध्ये वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. यात सेलू तालुक्यातील येळाकेळी, समुद्रपूर तालुक्यातील लोखंडी, हिंगणघाट निबोली, आष्टी तालुक्यातील साहूर, कारंजा तालुक्यातील राहटी चा सहा गावात वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. विजेपासून बचावाकरिता सुरक्षित राहण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. वादळ वारा सुरु होताच घरातील संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद करुन त्यांना विद्युत स्त्रोतापासून वेगळे करणे आवश्यक आहे. तसेच विजा कडाडत असताना मोबाईलवर बोलणे अत्यंत धोक्याचे असते. तसेच घराची दारे व खिडक्या बंद करणेही गरजेचे असते. घराबाहेर असल्यास आकाशात वीज चमकल्यावर मेघ गर्जनांचा आवाज आल्यास त्या ठिकानावरुन ३ ते ४ किलोमिटर परिसरात वीज पडण्याची दाट शक्यता असते. शेतात काम करत असताना पायाखाली लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवणे हितावह असते. तसेच झाडाखाली आश्रय घेणे धोक्याचे असते. कारण झाडाम्वर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.(वार्ताहर)