शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वादळात मोबाईलचा वापर धोक्याचा

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता.

वायगाव (नि़) : पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांनी केले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडल्याने जीवीत हानी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात अशा वेळी मोबाईलवर बोलणे टाळायणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात १३ जणांच्या अंगावार वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. जिल्ह्यातील ८ गावामध्ये वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. यात सेलू तालुक्यातील येळाकेळी, समुद्रपूर तालुक्यातील लोखंडी, हिंगणघाट निबोली, आष्टी तालुक्यातील साहूर, कारंजा तालुक्यातील राहटी चा सहा गावात वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. विजेपासून बचावाकरिता सुरक्षित राहण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. वादळ वारा सुरु होताच घरातील संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद करुन त्यांना विद्युत स्त्रोतापासून वेगळे करणे आवश्यक आहे. तसेच विजा कडाडत असताना मोबाईलवर बोलणे अत्यंत धोक्याचे असते. तसेच घराची दारे व खिडक्या बंद करणेही गरजेचे असते. घराबाहेर असल्यास आकाशात वीज चमकल्यावर मेघ गर्जनांचा आवाज आल्यास त्या ठिकानावरुन ३ ते ४ किलोमिटर परिसरात वीज पडण्याची दाट शक्यता असते. शेतात काम करत असताना पायाखाली लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवणे हितावह असते. तसेच झाडाखाली आश्रय घेणे धोक्याचे असते. कारण झाडाम्वर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.(वार्ताहर)