शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल व रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:29 IST

येथील विकास चौकानजीकच्या मानस अ‍ॅग्रो या पेट्रोल पंपावर रात्रीला विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल आणि रक्कम लांबविल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देसेलू येथील पेट्रोल पंपावरील प्रकार : चोरटा सीसीटीव्हीत कैद; पोलिसांचा बेफिकीरपणा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील विकास चौकानजीकच्या मानस अ‍ॅग्रो या पेट्रोल पंपावर रात्रीला विसावा घेणाºया प्रवाशांचे मोबाईल आणि रक्कम लांबविल्याचे समोर आले आहे. हा प्रकार शनिवारी रात्री घडला. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला; मात्र पोलिसांनी हा प्रकार गांभिर्याने घेतला नसल्याचे दिसून आले.या चोरीत दोन वाहनचालकांचे मोबाईल व आठशे रुपये रोख चोरीला गेले आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकाराची तक्रार रविवारी सायंकाळपर्यंत दाखल करण्यात आली नव्हती. यामागचे कारण विचारल्यास पोलिसांकडून मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.प्राप्त माहितीनुसार, शेगाव येथून गजानन महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आटोपून चिखल ढोकणा (उमरेड) येथील भाविक थकल्याने त्यांनी सेलू येथील मानस पेट्रोलपंपावर पोहचल्यावर गाडी उभी करून तेथे विसावा घेतला. सर्वजण अंथरुन टाकून झोपी गेले. रात्री २.२५ वाजता चोरट्याने वाहनाजवळ येवून त्याने गाडीतील मोबाईल व ८०० रुपये चोरले. पुन्हा काही मिळेल का याचा शोध घेत असताना महिलेला जाग आली. तिने सर्वांना जागे केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचवेळी अनिल पवार रा. मेहकर (बुलडाणा) याचाही मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. जीपचालक गौतम लामसोंगे रा. चिखल ढोकणा हा सर्वांसह व अ‍ॅपेचालक पवार यांनी सेलू पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पहाटे पवार यांना तक्रार लिहून द्यायला सांगितली. मात्र जीपचालकची तक्रार लिहून घेतली नाही. या प्रकाराबाबत पोलिसांत विचारणा केल्यानंतर ठाणेदारांनी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपनिरीक्षक रामटेके यांना केली. यानुसार भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केल्याचे ठाणेदारांनी सांगितले.आलेख सुधारण्याकरिता तक्रारींकडे दुर्लक्ष ?चोरीच्या गुन्ह्याची तक्रार दाखल करुन घेतली तर गुन्ह्याचा आलेख वाढतो. म्हणून चोरीच्या घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार येथे होत असल्याची चर्चा आहे.चोरीच्या घटनेची तक्रार देण्यासाठी तात्काळ फिर्यादी आले असता तक्रार घेवून गुन्हा दाखल केला नाही. शिवाय सीसीटीव्ही फुटेज गोळा केले नाही. सर्व फिर्यादी आपापल्या गावी पोहचले मात्र त्यांच्या स्वाक्षरीविना गुन्हा कसा दाखल करण्यात आला हे ही एक रहस्यच आहे.