शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

मनरेगाच्या कंत्राटी कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: March 31, 2015 01:43 IST

जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात मनरेगा योजनेचे केवळ २६ कोटीचे उद्दीष्ट होते. कंत्राटी कामगार व मजुरांनी ४८ कोटी रुपयांचे

तीन महिन्यांच्या मजुरीकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात मनरेगा योजनेचे केवळ २६ कोटीचे उद्दीष्ट होते. कंत्राटी कामगार व मजुरांनी ४८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले. असे असले तरी योजनेतील मजुरांना तीन महीने पूर्ण होत असूनही मजुरी मिळाली नाही. रोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या बॅँक खात्यात जमा होत नाही. मनरेगा योजनेचा बट्याबोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली. या निवेदनानुसार, मजुरांना प्रतिदिवस २७५ रुपये मजुरी दर आठवड्यात देण्यात यावी. ३ टक्के कामगार कल्याण निधीचा लाभ मिळावा, कामावर कार्यरत मजुरांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, नरेगा योजनेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कमी करावे. तसेच सुशिक्षीत युवकांना कामाची संधी द्यावी, सेतु एजंसीकडून काम कमी करावे, रो.ह.यो. सोसायटीकडे काम हस्तांतरीत करावे, रोजगार सेवकास दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करावे. ए.पी.ओ, ए.टी.ओ., डी.ई.ओ च्या मानधनात वाढ करावी. नरेगा योजनेचा स्वतंत्र कक्ष तयार करावा. कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री आहेत. त्यांनी मनरेगा योजनेकडे लक्ष केंद्रीत करावे. राज्यातील जवळपास २७ हजार रोजगार सेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संगणक चालकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात विकास कामाची यंत्रणा योजनेतील कंत्राटी कामगार, रोजगार सेवकच राबवू शकतात. मनरेगा योजनेचा अभ्यास राज्यसरकारने करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मोर्चात राजू गोरडे, राजकुमार कांबळे, सत्यजीत काचेवार, हेमंत नवनागे, दिनेश घारपुरे, संजय पाटील, संजय देशमुख, सुधाकर बोबडे यांच्यासह मजूर सहभागी होते. (प्रतिनिधी)