शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

महावितरणच्या चुकीचा भूर्दंड ग्राहकांवर

By admin | Updated: November 7, 2016 00:45 IST

वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद असताना नाममात्र कारवाई

नागरिकांना मन:स्ताप : अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली वाढीव देयके वायगाव (नि.) : वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची तरतूद असताना नाममात्र कारवाई करण्यात येत असल्याने वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे. वीज देयकात अतिरिक्त शुल्काच्या रूपाने वाढ करण्यात आल्याने महावितरणबाबत रोष वाढत आहे.याबाबत वीज ग्राहकांनी संबंधीतांना तक्रारी केल्या. मात्र, दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या महावितरकाच्या देयकात बदल झाला आहे. यात १०० युनिटपर्यंत ३.७६ रूपये व १०० युनिटच्या वर रिडींग झाल्यास ७.२१ रुपये करण्यात आले आहे. महावितरण विभागाने नवीन अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सी मार्फत कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत मीटर रिडींग नेणे अनिवार्य असताना ४० दिवसांनी ते नेण्यात येत असल्याने व त्यातही चुकीचे रिडींगची नोंद टाकण्यात येत आहे. फोटो घेऊनही देयकावर नो रिडींग लिहून देत आहे. चुक कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, भूर्दंड ग्राहकांना बसत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जास्त दिवसाचा कालावधील लोटल्याने रिडींग जास्त होत असून जास्त दराचे देयक नागरिकांना भरावे लागत आहे. तसेच वीज चोरीचाही फटका सर्वसामान्य नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. महावितरणने जर आयोगाने दर्शविलेल्या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असेल तर देयकात वीज शुल्क लावण्याचा अर्थ काय, असा प्रश्न ग्राहकांना उपस्थित करीत आहे. वीज चोरीचा भार सर्व सामान्यांवर लादला जात असल्याने ते आर्थिक संकटता सापडले आहेत. वीज ग्राहकांना देयकातील वाढीव शुल्काच्या रूपाने अतिरिक्त भार माथी मारल्या जात असल्याचे दिसून येते. शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात दिवसेंदिवस भर पडत असून याकडे संबंधीत अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्या भागातील ग्राहक वीज दयक थकबाकी ठेवतात. त्या भागातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागतो. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकरी करीत असून भाजीपाल्यासह रब्बी पीकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना ओलीतासाठी चोविस तास विजेची आवश्यक्ता आहे. मात्र, वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधीतांनी लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)