शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

एकुर्ली गावातील स्मशानभूमीच बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:51 IST

प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात.

ठळक मुद्देग्रामस्थांची गोची : शेताचा घ्यावा लागतो आधार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी तथा सौंदर्यीकरण करून व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासकीय धोरण आहे; पण जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड दिसतात. यामुळे लगतच्या शेतांचा आधार घेत अंत्यविधी उरकावा लागतो. असाच प्रकार एकुर्ली गावातही पाहावयास मिळतो. या प्रकारामुळे अंतिम संस्कार करताना ग्रामस्थांची गोची होते. याकडे लक्ष देत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) नजीकच्या एकुर्ली गावातील स्मशानभूमी बकाल झाली आहे. स्मशानभूमिच्या नावावर एकुर्ली येथे केवळ अल्लीपूर मार्गावर मुख्य रस्त्याच्या कडेला स्मशानशेड आहे. ही स्मशानभूमी दुर्लक्षित असून शेड पूर्णत: जीर्ण झाले आहे. तळेगाव (टा.) जि.प. सर्कलमध्ये येणाºया एकुर्ली गावातील दहा वर्षांपासून पं.स. सदस्य तर सध्या जि.प. सदस्यही आहेत. ते सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे जि.प. सदस्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.स्मशानभूमी नसल्याने एकुर्लीतील एका शेतकºयाच्या शेतात अग्नी द्यावा लागतो; पण पे्रताला अग्नी देताना पाऊस आल्यास नागरिकांसह पे्रतालाही पाण्याशी झुंज द्यावी लागते. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. स्मशान शेडला झुडपांसह वेलींचा विळखा असून मृतदेह शेडपर्यंत पोहोचविणेही कठीण झाले आहे. रात्री अंतिम यात्रा न्यायची असल्यास कुठेही पथदिव्यांची व्यवस्था नाही. सहभागींना गॅसबत्तीचा वापर करावा लागतो. पाण्याची सुविधा नसल्याने शेतातील विहिरीचा वापर करावा लागतो. अंत्यसंस्कारात येणाºया या अडचणींकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.पाणी, पथदिवे, बसण्याकरिता ओटेही नाहीतस्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते; पण एकुर्ली येथे स्मशानभूमिच्या नावावर केवळ दहन शेड आणि तेही जीर्ण अवस्थेत उभे असल्याने अन्य सुविधांबाबत विचारही करता येत नाही. येथे शेतातील विहिरीचे पाणी अंत्यसंस्कारासाठी वापरावे लागते. रात्री अंत्ययात्रा निघाल्यास काळोखातून वाट काढावी लागते. कुठेही पथदिवे नाही. स्मशानभूमित बसण्यासाठी ओटे नाहीत की वृक्षांची सावलीही नाही. यामुळे अंत्ययात्रेतही अनेक समस्यांचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. गावाकडे दुर्लक्ष करणारे सदस्य सर्कलच्या समस्या कशा सोडवतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.