शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कृषी सहायक महिन्याभरापासून बेपत्ता

By admin | Updated: September 18, 2015 01:55 IST

शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत.

मार्गदर्शनाचा अभाव : शेती कार्यशाळा घेण्यासही बगलच तळेगाव (श्या.पंत.) : शेती, शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून कृषी सहायक कार्यरत असतात. त्यांच्यामार्फत अनेक योजना शेतकरी, ग्रामस्थांना कळतात; पण गत एक महिन्यापासून तेच बेपत्ता आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शनच मिळत नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तळेगाव, रानवाडी व बेलोरा खुर्द या साझाकरिता एक कृषी सहायक असून ते गत एक ते दीड महिन्यापासून बेपत्ता आहे. शेतकरी कार्यालयात चकरा मारून थकले; पण कृषी सहायक मिळत नाही. तळेगाव-आष्टी मार्गावरील कृषी चिकित्सालयाचाही बेताल कारभार आहे. गोदामाची चौकशी झाल्यास तेथे शेतकऱ्यांना शासनाकडून येणारी कृषी रसायने, कृषी साहित्य नांगर, एक दात्याचे पेरणीयंत्र, कलमा, पाईप धूळखात पडून आहे. २०१३-१४ मध्ये फळबाग लागवडीसाठी कलमांचे प्रस्ताव सादर केलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नसल्याच्या तक्रारी आहेत. तो लाभ परस्पर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलल्याचेही तक्रारीत नमूद आहे.तळेगाव, काकडधरा, रामदरा, शिर्री, रानवाडी, बेलोरा खुर्द या साझामध्ये सुमारे दहा हजार शेतकरी आहे. खरीपाची पिके असल्याने शेतकरी पूर्णत: कृषी विभागावर अवलंबून आहे; पण त्यांना योग्यवेळी मार्गदर्शन मिळत नाही. दरवर्षी मार्गदर्शनार्थ शेतीशाळा घेतल्या जात होत्या; पण यंदा शेती कार्यशाळा कागदोपत्री दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. आमदार अमर काळे यांनी कारंजा शहरातील कृषी विभागाच्या गोदामांची पाहणी केली. यात अनियमितता आढळून आली. असाच प्रकार आष्टी तालुक्यातही आहे. आष्टी तालुका कृषी विभागांतर्गत येणाऱ्या तळेगावच्या रोपवाटीकेमधील गोदामाची पाहणी केल्यास तेथेही शेतकऱ्यांना वितरित न केलेले कृषी साहित्य बेवारस पडून असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)