शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आज ठरतील मिनी मंत्रालयाचे शिलेदार

By admin | Updated: February 23, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले.

यंत्रणा सज्ज : ८४७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला वर्धा : जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समितीकरिता १६ व २१ फेबु्रवारी रोजी मतदान झाले. तेव्हापासून सर्वांनाच निकालाची उत्सूकता लागली होती. ही उत्सूकता काही तास ताणली जाणार आहे. गुरूवारी मतमोजणी होत असून मिनी मंत्रालयाचा शिलेदार कोण, हे ठरणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून कर्मचारीही तैनात केले आहेत. जिल्ह्यात आठही तालुक्यात सकाळी ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ३३९ मतदारांची नोंद आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १६ फेबु्रवारी रोजी ४ लाख ९२ हजार २९६ मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. यात २ लाख ६३ हजार ७६७ पुरूष तर २ लाख २८ हजार ५२८ स्त्री मतदारांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील दोन गट व चार गणासाठी मतदान झाले. यात एकूण मतदार २७ हजार १९९ होते. यापैकी १९ हजार २६१ मतदारांनी मतदान केले. यात १० हजार ३४५ पुरूष तर ८ हजार ९१६ महिला मतदारांचा समावेश होता. ५२ जि.प. गट व १०४ पं.स. गणाकरिता ८४७ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरूवारी होणार आहे. मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. १३० टेबलवरून मतमोजणी केली जाणार असून सुमारे ९०० अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आहेत. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आष्टी, कारंजा, समुद्रपूर, देवळी आणि हिंगणघाट येथील मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात करण्यात येणार आहे. आर्वी येथील मतमोजणी गांधी विद्यालयात, सेलू येथे दिपचंद चौधरी विद्यालय तर वर्धा येथील मतमोजणी जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात येणार आहे. यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त मतमोजणी शांततेत पार पडावी, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यातील आठही ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, दहा पोलीस निरीक्षक, ३४ सहायक पोलीस निरीक्षक, ४३५ पोलीस कर्मचारी, एसआरपीची एक कंपनी आणि राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. १३० टेबलवरून मतमोजणी मतमोजणीसाठी वर्धेत क्रीडा संकुलावर व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्धेत २८ टेबलवर मोजणी होणार असून १ ते १४ टेबलवर जि.प. गटांची तर १५ ते २८ टेबलवर पं.स. गणाची मोजणी होईल. सेलू येथे १८ टेबल, देवळी, समुद्रपूर व कारंजा येथे प्रत्येकी १२ टेबल, हिंगणघाट येथे २१, आष्टी ९ तर आर्वी येथे १८ टेबलवर मतमोजणी पार पडणार आहे.