शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अप्पर वर्धा प्रकल्प उद्यान योजनेचा आराखडा मंत्रालयात धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 13:11 IST

Wardha News १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती.

ठळक मुद्दे२९ वर्षांपासून कार्यवाही नाहीचपर्यटकांची वाढतेय गर्दी पण, सुविधांचा अभाव कायमच

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला अप्पर वर्धा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांकरिता वरदान ठरला आहे. येथील उद्यानाला विकसित करून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात आराखडा तयार करून मंत्रालयात सादर केला. पण, आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही ही फाईल धूळखात पडून असल्याने ‘शासकीय काम २९ वर्षे थांब’, असा दफ्तरदिरंगाईचा अनुभव दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आला आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा तर अर्धा भाग मोर्शी विधानसभा क्षेत्रात येत असून हे दोन्ही विधानसभा क्षेत्र वर्धा लोकसभा क्षेत्राचा भाग आहेत.

अप्पर वर्धा धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी असते, त्यामुळे १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार विकास आराखडा तयार करून आॅगस्ट १९९१-९२ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी अप्पर वर्धा धरणाच्या तीरावरील प्रस्तावित उद्यानाच्या जागेची पाहणी केली. सोबतच राज्यातील खासगी वास्तुशास्त्र-डिझायनर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अप्पर वर्धा धरणाच्या विश्रामगृहात चर्चा झाली. त्यानंतर हा आराखडा मंजुरीकरिता मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याला आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही मंजुरी मिळाली नसून धूळखात पडला आहे. त्यामुळे येथील सुविधेअभावी पर्यटकांमध्ये नाराजीचा दिसून येत आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता या आराखड्याला मंजुरी देऊन विकास साधण्याची मागणी होत आहे.

आराखड्यात या गोष्टींचा होता समावेशउद्यानासाठी प्रकल्पाच्या उजव्या बाजूला ४५.७८ हेक्टर जमीन व डाव्या बाजूला ३८.८८ हेक्टर जमीन प्रस्तावित केली होती. या जमिनीवर बालोद्यान, धबधबा, वसतिगृह, उपाहारगृहे, दुकाने, लॉगहॅट, मॉडेल्स, तंबू वसाहत, रस्ते, पायवाटा, प्राणी व पक्षी, मत्स्य संग्रहालय, रोपटे, पवनचक्की, जलक्रीडा अंतर्गत वॉटर पार्क, निसर्ग उपचार केंद्र, योग केंद्र आणि पोलिस चौकी प्रस्तावित होती.

अप्पर वर्धा उद्यान योजना ही पूर्णत: धूळखात पडली असून शासनाने काही प्रमाणात येथे उद्यान योजनेकरिता केलेला खर्च व्यर्थ जात आहे. शासनाने नियोजनाप्रमाणे या उद्यानावर पूर्ण खर्च करून पर्यटन विकासाला चालना देवून देत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा क्षेत्र

टॅग्स :Governmentसरकार