शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम रेल्वेस्थानक मॉडेल करण्याला मंत्रालय सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:41 IST

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून............

ठळक मुद्देखासदारांची माहिती : लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसीत करावे या सोबतच गांधीजींची कर्मभूमी सेवाग्राम ते जन्मभूमी पोरबंदर येथील संदिपनी आश्रम रेल्वे सेवेनी जोडले जावे, अशी मागणी खा. तडस यांनी केली.खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष त्याकडे वेधले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी सदर प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त अत्यंत चांगला प्रस्ताव खा. तडस यांनी मांडला आहे. रेल्वे मंत्रालय नक्कीच या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुर्णत्वास नेईल, असे स्पष्ट केले.आपल्या लोकसभेतील प्रश्नोत्तर काळाच्या उत्तरातून स्पष्ट करताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त विविध कार्यक्रम आणि परीयोजना देश भर राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच झालेला आहे. खासदार रामदास तडस यांच्या सूचना आणि निवेदन अत्यंत महत्वपूर्ण असून त्यांच्या मागणीवर रेल्वे मंत्रालय नक्कीच सकारात्मक विचार करून वेळीच योग्य निर्णय घेईल, असेही सांगितले. सदर विषय पूर्णत्वास गेल्यास सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार आहे.रेल्वे मार्गाचा विद्युतीकरण प्रस्ताव केंद्र शासन २०२२ पर्यंत पूर्ण करणारसंसदेमध्ये आपल्या पुरवणी प्रश्न क्र. २ नमुद करताना खासदार रामदास तडस यांनी मुद्दा उपस्थित केला की, वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे कार्य २०१४ नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती पोर्टलच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रारंभी डिझेल इंजिनचा उपयोग कार्यान्वीत करणे प्रस्तावीत आहे. परंतु, पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन भविष्यामध्ये वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह पूर्ण करण्यात केंद्र शासनाचे नियोजन आहे काय, याबाबत रेल्वे मंत्री यांच्याकडे स्पष्टीकरण मागीतले. सदर पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी स्पष्ट केले की, २०२२ पर्यंत भारतातील जवळपास सर्व रेल्वे मार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पासह पूर्ण करण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. शिवाय २०२२ पर्यंत हा मार्ग विद्युतीकरणाकरिता प्राधान्याने विचारात घेऊन पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.आज उपस्थित केलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन महत्वाचे विषय लोकसभेत चर्चा झाल्याने निश्चितच मार्गी लागतील आणि त्याकरिता माझा सतत पाठपुरावा सुरु असेल. वर्धा लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू. शिवाय नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस