शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सेवाग्राम रेल्वेस्थानक मॉडेल करण्याला मंत्रालय सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:41 IST

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून............

ठळक मुद्देखासदारांची माहिती : लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन होत असून यामध्ये महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राम आश्रमा जवळ असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाला जागतीक दर्जाचे प्रवासी केंद्र आणि मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून विकसीत करावे या सोबतच गांधीजींची कर्मभूमी सेवाग्राम ते जन्मभूमी पोरबंदर येथील संदिपनी आश्रम रेल्वे सेवेनी जोडले जावे, अशी मागणी खा. तडस यांनी केली.खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष त्याकडे वेधले. रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी सदर प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले की, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त अत्यंत चांगला प्रस्ताव खा. तडस यांनी मांडला आहे. रेल्वे मंत्रालय नक्कीच या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुर्णत्वास नेईल, असे स्पष्ट केले.आपल्या लोकसभेतील प्रश्नोत्तर काळाच्या उत्तरातून स्पष्ट करताना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षा निमित्त विविध कार्यक्रम आणि परीयोजना देश भर राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच झालेला आहे. खासदार रामदास तडस यांच्या सूचना आणि निवेदन अत्यंत महत्वपूर्ण असून त्यांच्या मागणीवर रेल्वे मंत्रालय नक्कीच सकारात्मक विचार करून वेळीच योग्य निर्णय घेईल, असेही सांगितले. सदर विषय पूर्णत्वास गेल्यास सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा चेहरा बदलणार आहे.रेल्वे मार्गाचा विद्युतीकरण प्रस्ताव केंद्र शासन २०२२ पर्यंत पूर्ण करणारसंसदेमध्ये आपल्या पुरवणी प्रश्न क्र. २ नमुद करताना खासदार रामदास तडस यांनी मुद्दा उपस्थित केला की, वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे कार्य २०१४ नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या प्रगती पोर्टलच्या देखरेखीखाली अत्यंत चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रारंभी डिझेल इंजिनचा उपयोग कार्यान्वीत करणे प्रस्तावीत आहे. परंतु, पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन भविष्यामध्ये वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह पूर्ण करण्यात केंद्र शासनाचे नियोजन आहे काय, याबाबत रेल्वे मंत्री यांच्याकडे स्पष्टीकरण मागीतले. सदर पुरवणी प्रश्नाला उत्तर देतांना रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी स्पष्ट केले की, २०२२ पर्यंत भारतातील जवळपास सर्व रेल्वे मार्ग वर्धा-नांदेड प्रकल्पासह पूर्ण करण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. शिवाय २०२२ पर्यंत हा मार्ग विद्युतीकरणाकरिता प्राधान्याने विचारात घेऊन पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.आज उपस्थित केलेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील दोन महत्वाचे विषय लोकसभेत चर्चा झाल्याने निश्चितच मार्गी लागतील आणि त्याकरिता माझा सतत पाठपुरावा सुरु असेल. वर्धा लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू. शिवाय नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असे खा. रामदास तडस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस