शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

झिरो बॅलन्स अकाऊंटला किमान रोख मर्यादेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:12 IST

जनधन योजनेच्या नावाखाली केंद्र सरकारने सत्तारुढ झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे बॅँक खाते उघडले.

ठळक मुद्देशेतकºयांना अडचण : स्टेट बॅँकेचे सर्वाधिक ग्राहक प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनधन योजनेच्या नावाखाली केंद्र सरकारने सत्तारुढ झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे बॅँक खाते उघडले. खाते उघडताना झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्यात आले. आता मात्र भारतीय स्टेट बॅँकेसारख्या मोठ्या बॅँकेत खात्यावर किमान ३००० रूपये रक्कम ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जनधन योजनेतील हजारों खातेधारकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.देशात व राज्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक लोक बॅँकींग क्षेत्राशी जुळलेले नाही. अनेकांचे बॅँक खाते नाही. त्यामुळे जनधन योजनेच्या नावाखाली बॅँकांना उद्दीष्ट देवून मोठ्या प्रमाणावर बॅँके खाते उघडण्यात आले. अनेक ठिकाणी बॅँकामार्फत व खाजगी संस्थांमार्फत शिबिर व मेळावे आयोजित करून जनधन योजनेत बॅँक खाते काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. नागरिकांना बॅँक खाते काढण्यासाठी कुठलेही पैसे लागणार नाही, असे सांगण्यात आले होते.झिरो बॅलेन्स अकाऊंट काढल्यानंतर नोटबंदीचा निर्णय झाला. त्यावेळी काही खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कमा जमा झाल्या होत्या. ही बाब समोर आल्यानंतर भारतीय स्टेट बॅँकेने खातेदाराच्या खात्यात किमान ३००० हजार रूपये मिनीमम बॅलेन्स ठेवावाच लागेल, असा नियम केला. त्यामुळे शेकडो खातेदार अडचणीत आले आहे.भारतीय स्टेट बॅँकेत अनेक निराधार, वृध्द, निवृत्ती वेतनधारक व शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांच्या खात्यावर महिन्याला एखाद्यावेळी रक्कम जमा होते. साधारणत: ५०० रूपये खात्यात ठेवून असे खातेदार इतर रक्कम काढून घेतात. मात्र आता ३००० हजाराची अट घालण्यात आल्याने या खातेदारांची मोठी अडचण झाली आहे. इतर राष्ट्रीयकृत बॅँकेमध्ये साधारणत: १५०० रूपयापासून मिनीमम रक्कम खात्यावर ठेवावी लागत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ज्येष्ठ नागरिक, निराधार, शेतकरी व पेंशनर यांच्यामध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. या नियमांची अंमलबजावणी केल्याने खातेदारांना भुर्दंड पडत आहे.नवीन नियमांचा ग्राहकांनाच मनस्तापशासनाने सुरू केलेल्या योजनांमुळे नागरिकांना सुविधा होण्याऐवजी मनस्ताप अधिक सहन करावा लागत असल्याचे अनेकदा दिसून आले. सुरूवातीला खाते उघडताना कागदपत्राची अट शिथील करण्यात आली होती. कालांतराने ग्राहकांना पॅनकार्ड जोडणे अनिवार्य केले. तसेच आधार क्रमांक लिंक करताना ग्राहकांना बँकेत वारंवार चकरा माराव्या लागल्या. जनधन योजनेतील खातेधारकांना नवीन नियमामुळे त्रास होत आहे