शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

By admin | Updated: August 21, 2016 01:09 IST

जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

वर्धा तालुक्यात तीन नवे जि.प. गट उदयास : आष्टी व कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट कपातराजेश भोजेकर वर्धाजिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर हे बदल आगामी जि.प. व प.सं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. नव्या संररचनेनुसार वर्धा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकने वाढली असून ती ५१ वरुन ५२ करण्यात आली आहे. तर आष्टी आणि कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी करतानाच वर्धा तालुक्यातील गटांची संख्या ११ वरुन तब्बल १४ वर गेली आहे. स्वाभाविक, गणांची संख्या २२ वरुन २८ असणार आहे.नव्याने करण्यात आलेली ही गट व गणांची संरचना २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या निवडणुकासाठी असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या २९७ पंचायत समित्यांची मुदत सन २०१७ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहे. या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेवर आधारीत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १८ आॅगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९(१) नुसार जिल्हा परिषदेकरिता देय असलेली एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय विभागणी करणे, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा व त्यांचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व जमातीकरिता आरक्षित प्रभागासह) तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर करावयाचा असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. वर्धा जिल्हा परिषदेची संख्या ५१ वरुन वाढवून ५२ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू आणि समुद्रपूर या चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. तेथे नंतर निवडणूकाही घेण्यात आल्या. उल्लेखनीय, नगर पंचायत झालेल्या ग्रामपंचायती पूर्वी जि. प. गट होत्या. आगामी जि.प. निवडणुकीसाठी या गटांऐवजी नवे गट उदयास येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आष्टी व कारंजा हे गट कमी केले आहे. आष्टी तालुक्यातून चार ऐवजी तीनच आणि कारंजातून पाच ऐवजी चारच सदस्य जि.प.त जाणार आहे. १८ पैकी १४ पंचायत समिती सदस्यच निवडतील. परिणामी या तालुक्यातील विद्यमान जि.प. व पं.स. सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वर्धा तालुक्यात ११ ऐवजी आता १४ जि.प.सदस्य व २८ पं.स. निवडले जाईल. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी चालून आल्यामुळे अनेकांना जि.प. व पं.स. सदस्य पदाचे डोहाळे लागणार असल्याचे बोलले जात आहे.