शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

By admin | Updated: August 21, 2016 01:09 IST

जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

वर्धा तालुक्यात तीन नवे जि.प. गट उदयास : आष्टी व कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट कपातराजेश भोजेकर वर्धाजिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर हे बदल आगामी जि.प. व प.सं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. नव्या संररचनेनुसार वर्धा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकने वाढली असून ती ५१ वरुन ५२ करण्यात आली आहे. तर आष्टी आणि कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी करतानाच वर्धा तालुक्यातील गटांची संख्या ११ वरुन तब्बल १४ वर गेली आहे. स्वाभाविक, गणांची संख्या २२ वरुन २८ असणार आहे.नव्याने करण्यात आलेली ही गट व गणांची संरचना २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या निवडणुकासाठी असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या २९७ पंचायत समित्यांची मुदत सन २०१७ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहे. या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेवर आधारीत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १८ आॅगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९(१) नुसार जिल्हा परिषदेकरिता देय असलेली एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय विभागणी करणे, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा व त्यांचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व जमातीकरिता आरक्षित प्रभागासह) तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर करावयाचा असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. वर्धा जिल्हा परिषदेची संख्या ५१ वरुन वाढवून ५२ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू आणि समुद्रपूर या चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. तेथे नंतर निवडणूकाही घेण्यात आल्या. उल्लेखनीय, नगर पंचायत झालेल्या ग्रामपंचायती पूर्वी जि. प. गट होत्या. आगामी जि.प. निवडणुकीसाठी या गटांऐवजी नवे गट उदयास येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आष्टी व कारंजा हे गट कमी केले आहे. आष्टी तालुक्यातून चार ऐवजी तीनच आणि कारंजातून पाच ऐवजी चारच सदस्य जि.प.त जाणार आहे. १८ पैकी १४ पंचायत समिती सदस्यच निवडतील. परिणामी या तालुक्यातील विद्यमान जि.प. व पं.स. सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वर्धा तालुक्यात ११ ऐवजी आता १४ जि.प.सदस्य व २८ पं.स. निवडले जाईल. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी चालून आल्यामुळे अनेकांना जि.प. व पं.स. सदस्य पदाचे डोहाळे लागणार असल्याचे बोलले जात आहे.