शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालय आता ५२ सदस्यांचे

By admin | Updated: August 21, 2016 01:09 IST

जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

वर्धा तालुक्यात तीन नवे जि.प. गट उदयास : आष्टी व कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट कपातराजेश भोजेकर वर्धाजिल्ह्यात चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर जि.प. गट आणि गणांची पुनर्रचना होणार हे जवळपास निश्चित झाले होते. अखेर हे बदल आगामी जि.प. व प.सं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. नव्या संररचनेनुसार वर्धा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या एकने वाढली असून ती ५१ वरुन ५२ करण्यात आली आहे. तर आष्टी आणि कारंजा तालुक्यातून प्रत्येकी एक गट आणि दोन गण कमी करतानाच वर्धा तालुक्यातील गटांची संख्या ११ वरुन तब्बल १४ वर गेली आहे. स्वाभाविक, गणांची संख्या २२ वरुन २८ असणार आहे.नव्याने करण्यात आलेली ही गट व गणांची संरचना २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या निवडणुकासाठी असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या २९७ पंचायत समित्यांची मुदत सन २०१७ मध्ये संपत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या आहे. या अनुषंगाने २०११ च्या जनगणनेवर आधारीत जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने १८ आॅगस्ट २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ९(१) नुसार जिल्हा परिषदेकरिता देय असलेली एकूण सदस्य संख्या निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने पंचायत समितीनिहाय विभागणी करणे, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा व त्यांचे आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व जमातीकरिता आरक्षित प्रभागासह) तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर करावयाचा असल्याचे निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. वर्धा जिल्हा परिषदेची संख्या ५१ वरुन वाढवून ५२ करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आष्टी, कारंजा, सेलू आणि समुद्रपूर या चार ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर झाले. तेथे नंतर निवडणूकाही घेण्यात आल्या. उल्लेखनीय, नगर पंचायत झालेल्या ग्रामपंचायती पूर्वी जि. प. गट होत्या. आगामी जि.प. निवडणुकीसाठी या गटांऐवजी नवे गट उदयास येईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आष्टी व कारंजा हे गट कमी केले आहे. आष्टी तालुक्यातून चार ऐवजी तीनच आणि कारंजातून पाच ऐवजी चारच सदस्य जि.प.त जाणार आहे. १८ पैकी १४ पंचायत समिती सदस्यच निवडतील. परिणामी या तालुक्यातील विद्यमान जि.प. व पं.स. सदस्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. वर्धा तालुक्यात ११ ऐवजी आता १४ जि.प.सदस्य व २८ पं.स. निवडले जाईल. यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी चालून आल्यामुळे अनेकांना जि.प. व पं.स. सदस्य पदाचे डोहाळे लागणार असल्याचे बोलले जात आहे.