शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: November 27, 2015 02:26 IST

जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. येथे विकासात्मक निर्णय घेण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते;

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची ६४ पदे रिक्त : रिक्त पदे भरण्याची जिल्हावासीयांची मागणीवर्धा : जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. येथे विकासात्मक निर्णय घेण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते; मात्र वर्धेच्या या विकास मंत्रालयाला रिक्त पदांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. येथे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकूण ६४ पदे रिक्त आहेत. वर्ग एक आणि वर्ग-२ ची पदे भरण्याचे अधिकार राज्य शासनाला आहे. शासनाने याबाबत लवकर हालचाली करून पदांचा अनुशेष दूर करण्याची मागणी आहे.जिल्हा परिषदेतील महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनातील कारभार चालविताना अनेक अडचणी येतात. परिणामी, एकाच अधिकाऱ्यांवर एकापेक्षा अधिक पदांचा भार येतो. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनाही सहन करावा लागतो. यामुळे येथील रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी आहे. रिक्त पदांचा सर्वात मोठा बॅकलॉग आरोग्य विभागाचा आहे. येथे एकूण ५४ पदे रिक्त आहेत. ऋतू बदलामुळे अनेक आजार बळावत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम चिमुकल्यांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय शासनाच्या विविध योजना अंमलात येत आहेत. त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारीही या विभागावर आहे. यामुळे येथे एका कर्मचाऱ्यावर अनेक कामांचा भार येत असल्याचे दिसते. जिल्ह्याच्या विकासाकरिता आवश्यक योजना राबविण्यास्तव कर्मचाऱ्यांची आवश्यक संख्या जिल्हा परिषदेत असणे अनिवार्य असल्याचे बोलले जात आहे. वर्ग १ आणि वर्ग २ ची पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नाही. शासन स्तरावर ही बाब गांभिर्याने घेतल्यास हा पदांचा अनुशेष दूर करता येणे शक्य आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)