शासन प्रमाणित चाचण्यांना फाटा : नागरिकांच्या आरोग्याशी व्यावसायिकांचा खेळगौरव देशमुख वर्धाशहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटर कॅन प्रत्येक दुकानात कार्यक्रमात वापरण्याचे फॅड वाढले आहे. याचाच लाभ घेत शहरालगत असलेल्या काही शेतात अशा मिनरल वॉटरच्या मोठ्या कंपन्या उभ्या राहत आहेत. शेतात बोअरवेल करून मिनरल वॉटरच्या नावाखाली वॉटर जार मधून बिनबोभाट पाणी विकल्या जात आहे. उन्हाळ्याचा फायदा घेत हा व्यवसाय जोर धरत असल्याचे दिसते. यावर अन्न व औषधी प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने या पाणी माफियांचा व्यवसाय फोफावत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात विकल्या जात असलेल्या पाण्याची कधी तपासणी होते अथवा नाही याची माहिती अन्न व औषधी विभागाच्यावतीने देण्यात आली नाही. शिवाय त्यांच्यावतीने कधी अशी तपासणी करण्यात आल्याची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर पाण्याचा मिनरल वॉटरचा प्रकल्प सुरू करण्याकरिता अन्न व औषणी विभागाची परवानगी हवीच, असे नसल्याचे विभागाच्या सहायक आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जलजन्य आजार या विषयी समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. मुळात उन्हाळ्यात घराबाहेर पाण्याच्या शुद्धतेची खात्री नसल्याने खुल्या पाण्याचा धोका घ्यायला कोणीही धजावत नाही. त्यामुळे मोठ्या आस्थापनांना जेव्हा उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाण्याची गरज वाटू लागली तेव्हा थेट घरपोहोच पाणी ते देखील शद्ध व थंड करून देता येईल यावर विचार सुरू झाला. मात्र मिनरल वॉटरचे प्लांट महागडे ठरत असल्याने राज्यातील काही उद्योजकांनी त्यास तुलनेत अगदी कमी किमतीची मशनरी तयार करून मिनरल वॉटरला पर्याय दिला.शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटरचे प्लांट टाकून पाणी विक्रीचा व्यवसाय झपाट्याने वाढले. हेच पाणी आता हजारो जार द्वारे मिनरल वॉटरचे लेबल मारून ग्राहकांना विकले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश मिनरल वॉटर प्लांट विना परवानगीचे असल्याचे दिसून येत आहे. नियमाप्रमाणे शेतात बोअरवेल करायला परवानगी लागते. मात्र बहुतांश शेतात मिनरल वॉटर प्लांट टाकले आहे. बोअरवेलचे पाणी ग्राहकांना विकल्या जात आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाचेही लक्ष नाही. त्यामुळे फुकटात मिळणाऱ्या पाण्यावर कोणत्याही गुणवत्तेची हमी न देणारा लाखोंनी पैसा कमविण्याचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. याकडे अन्न व औषधी विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.वॉटर प्लान्टला वर्धेतून परवानगी नाहीमिनरल वॉटरच्या प्रकल्पाला परवानगी देण्याची मुभा येथील अन्न व औषधी विभागाला नाही. ती परवानगी मुंबई येथून देण्यात येते. वर्धेत तसे चार प्रकल्प नोंदणीकृत असल्याची माहिती असून इतर ठिकाणी मिनरल वॉटरच्या नावावर गोरखधंदा सुरू असल्याचे दिसते.सध्या उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. मिनरल वॉटर पाण्याचे जार विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. आमच्या विभागामार्फत मिनरल वॉटर प्लांटच्या पाण्याची तपासणी केल्या जाईल, असे काही आढळल्यास त्या प्लांट धारकावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.- एन. आर. वाकोडेसहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन (प्रभारी), वर्धाशेतात बोअर करून मिनरल वॉटरची निर्मितीबोअरच्या लगत नाला किंवा गटर असल्यास त्यातील पाणी झिरपण्याची भीती असते. शेतात प्लांट असल्यास बोअरची परवानगी घेणे बंधनकारक आहे. येथे मात्र सर्रास बोअरवेल खोदून मिनरल वॉटर प्लांट थाटल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे संबंधित विभागाने पाण्याची चाचणी करणे गरजेचे आहे.पाण्याच्या १८ ते २० लिटरच्या एका जारसाठी २५ ते ३० रुपये आकारले जातात. वर्धा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मिनरल वॉटर प्लांट आहेत. प्रत्येक प्लांट दिवसात सरासरी चार हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करतो. शासकीय, निमशासकीय कार्यालये खासगी संस्था, किरकोळ विक्रीचे दुकाने व किराणा दुकाने, लग्न समारंभात, पार्टी या ठिकाणी पाण्याचे जार सहज घेतले जातात. प्रत्येक मिनरल वॉटर प्लांटधारक १०० ते १५० जार सहज विकतो. पाणी वितरणासाठी प्रत्येक व्यावसायिकाकडे सुमारे ६०० ते ८०० जार असावे, असेही त्यांनी सांगितले.
बोअरवेलच्या पाण्याला मिनरल वॉटरची चव
By admin | Updated: February 24, 2016 02:06 IST