शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमा नसलेली लाखो वाहने धावताहेत रस्त्यावर

By admin | Updated: January 20, 2015 22:40 IST

कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास या विम्याचा सहजपणे लाभ घेता येते.

वर्धा : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास या विम्याचा सहजपणे लाभ घेता येते. मात्र वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने बिगर विम्यानेच धावत आहे. सध्या रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरू असतानाही याकडे डोळेझाक होत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक वाहने धावत आहेत. दरवर्षी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वाहन खरेदी केल्यानंतर वाहनचालकाने विमा काढावा, असा दंडक आहे. वाहनचालकांनी विमा काढला असेल तर अपघाताप्रसंगी संबंधित वाहन चालकाला नुकसान भरपाई मिळू शकते. मुख्य म्हणजे अशा अपघातांमध्ये कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यानंतर वाहन चालकाकडे विमा नसल्यास कुटुंबातील सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहन चालकांकडे विमा नसल्यास वाहतूक पोलीस विभाग व आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते.वाहनचालकांमध्ये जागरूकता यावी, म्हणून शासनाकडून विविध शिबिरे राबवून मार्गदर्शन केले जाते. परंतु अजूनही जिल्ह्यातील लाखों वाहनचालक विमा काढण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बहुतेक वाहनचालक वाहनांची खरेदी करताना नियम असल्याने केवळ औपचारिकता म्हणून विमा काढतात. वाहन खरेदी करताना विमा काढल्यानंतर या विम्याची कालमर्यादा केवळ एकाच वर्षाची असते. त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही खासगी कपंनीकडून विमा काढणे नियमानुसार आवश्यक आहे. परंतु एकदा वाहन खरेदी केल्यानंतर दुसऱ्यांदा विमा काढला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाहनाला अपघात झाल्यानंतर न्यायालयीन प्रकरणात विम्याची अत्यंत गरज भासते. त्यामुळे शासनाने विमा काढणे सक्तीचे केले आहे.(शहर प्रतिनिधी)