शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रोपवाटिकेचा लाखो रुपयांचा शासकीय निधी मातीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:53 IST

राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो.

ठळक मुद्देपाण्याअभावी रोपटे करपली : सुविधा असतानाही त्याचा उपयोग घेण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राज्य सरकार दरवर्षी वृक्षारोपणासाठी करोडो रूपयांचा निधी वेगवेगळ्या विभागासाठी मंजूर करतो. यातीलच सर्वात महत्वाच आणि जबाबदारीच खाते म्हणजे वन विभाग आहे. वन विभागातर्फे मनरेगांतर्गत रोपवाटिकेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. त्यातील खरंच किती योग्य कामासाठी खर्च होतो आणि किती वाया जातो याचे उदाहरण सध्या बघावयास मिळत आहे. या परिस्थितीमुळे रोपवाटीकेचा लाखोंचा शासकीय निधी मातीत गेल्याची चर्चा परिसरात होत आहे.पक्षीमित्र प्रविण कडू, पर्यावरण संवर्धन संस्थेचे आशीष भोयर, प्रदिप गिरडे हे रविवारी जंगल भ्रमंती तसेच जंगलातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी हिंगणघाट शहरालगत असलेल्या आजंती बंधाऱ्याच्या शेजारी असलेल्या वन विभागाच्या रोपवाटिकेतील परिस्थितीची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी रोपवाटीकाच कर्मचाºयांच्या मनमर्जीने चालत असल्याचे दिसून आले. शिवाय तेथील विविध कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे या वृक्षप्रेमींच्या निदर्शनास आले. ४० लाखांपेक्षा अधिक निधी या रोपवाटिकेसाठी खर्च झाला आहे. मात्र, रोपवाटिकेमधील अर्धेअधीक माती भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये केवळ वाळलेली मातीच असल्याचे पुढे आले. काहींना विचारणा केली असता त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर ही परिस्थिती मागील काही महिन्यांपासून अशीच असल्याचे सांगितले. तेथील अनेक रोपटे पाण्याअभावी करपल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. वास्तविक पाहता या येथे रोपटे तयार करण्यासाठी मनरेगाच्या अंतर्गत मजुरांची नियुक्ती करून कामे केली जातात. परंतु, १ लाख ४५ हजार रोपटे तयार करण्याची क्षमता असलेल्या या रोपवाटीकेत रोपट्यांना वेळीच पाणी दिल्या जात नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे प्रत्येक दोन वाफ्यानंतर नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी दुर्लक्षीत धोरण अवलंबिले जात आहे. या रोपवाटीकेत रोपवाटीका तयार करण्याच्या मुळे उद्देशाला मुठमाती दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.छुप्या पद्धतीने सागाची तस्करी?एकीकडे रोपवाटिकेची समस्या आहे तर दुसरीकडे या भागातील जंगलच अवैध वृक्षतोड करणाºयांकडून संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जंगलव्याप्त परिसरात मोठाली सोन्याचा भाव मिळणाºया सागाची झाड आहेत. परंतु, त्यांची लाकुड तस्करांकडून छुप्या पद्धतीने अवैध तोड केली जात असल्याचे चित्र जंगलाचा फेरफटका मारल्यावर दिसून येते.

टॅग्स :forest departmentवनविभाग