शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांना लिटरमागे २० रुपयांचा नफा

By admin | Updated: April 18, 2017 01:15 IST

वित्तमंत्र्यांच्या सूचनेवरून मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादन वाढीसाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

राज्य शासनाचा विशेष उपक्रम : ३४ गावांत सामंजस्य करारानंतर अंमलबजावणी महेश सायखेडे वर्धा वित्तमंत्र्यांच्या सूचनेवरून मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादन वाढीसाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. याकरिता पशु, दुग्ध व मत्स्य विभाग तथा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या उपक्रमाकरिता वर्धा जिल्ह्यातील ३४ गावांची निवड झाली आहे. या योजनेमुळे ३४ गावांतील दूध उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून पूर्वीच्या तुलनेत लिटरमागे तब्बल २० रुपयांचा नफा होत आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये शासनाने दूध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाची घोषणा केली. सध्या या उपक्रमाची जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाकडून अंमलबजावणी सुरू आहे. उपक्रमात आष्टी तालुक्यातील चार, आर्वी तालुक्यातील १३, कारंजा तालुक्यातील ११, वर्धा तालुक्यातील चार, देवळी तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. येथील गो-पालकांना जि.प. पशुसंवर्धन विभाग मार्गदर्शन करीत आहे. उत्पादीत होणारे दूध गावातच खरेदी होत आहे. गावातच खरेदीदार उपलब्ध होत असल्याने दूध उत्पादकांचेही खेटे वाचले आहेत.पशुसंवर्धन विभागाकडून विविध सुविधाआॅनलाईन मिळतो दुधाचा चुकारानिवड करण्यात आलेल्या ३४ गावांमधून कमी- अधिक प्रमाणात दूध विकत घेतले जाते. संकलिक केलेल्या दुधाचा चुकारा आठवड्यातून एक दिवस केला जातो. दूध उत्पादक व खरेदीदार यांच्यातील व्यवहार पारदर्शी व्हावे, यासाठी दुधाच्या चुकाऱ्याची रक्कम आॅनलाईन पद्धतीचा वापर करून दिली जाते. निवड केलेल्या जिल्ह्यातील ३४ गावांमधील दूध उत्पादकांना जि.प. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने हिरवा चारा पुरविण्यासह विविध सुविधा देण्यात येत आहेत. २०१७-१८ मध्ये ६ हजार ६०० गोपालकांना चारा उपलब्ध करून देण्यात येणार असून वैरण बियाण्यांचेही वाटप करण्यात येईल. त्याचप्रमाणे वेळोवेळी केवळ १ रुपया शुल्क आकारून जनावरांचे लसीकरण केले जाईल. दूध उत्पादकांच्या डोळ्यासमोर ठरतो दरगावातच दुधाची विक्री होत असल्याने तसेच योग्य भाव मिळत असल्याने दूध उत्पादकांसाठी समाधानकारक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ३४ गावांत दूध खरेदीचे केंद्र देण्यात आल्याने दुधाला प्रती लिटर १८ ते २० रुपये अधिकचा दर मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गायीच्या दुधाला प्रती लिटर ३८ ते ४० आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर दिला जात आहे. त्याची पावतीही विक्रेत्याला देण्यात येत आहे. यामुळे हा उपक्रम दूध उत्पादकांसाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसते.जिल्हाधिकारी घेतात वेळोवेळी आढावाजिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये राबविल्या जात असलेल्या विशेष उपक्रमाचा आढावा वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला जातो. वेळप्रसंगी ते दूध संकलन केंद्रांनाही भेटी देत कामकाजाची पाहणी करतात. प्रत्येक महिन्याला घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत असून त्याची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.एडीडीबी आल्याने दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे. आमच्याकडे चाऱ्याचे योग्य नियोजन आहे. राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमामुळे सुवर्ण संधीच जिल्ह्यातील गोपालकांसाठी आहे. या योजनेमुळे बाजारपेठ उपलब्ध झाली असून याचा गोपालकांनी लाभ घ्यावा. कुठल्याही अडचणी आल्यास थेट जि.प. पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करावी.- डॉ. सतीश राजू, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.