शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट!
2
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
3
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
4
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
5
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
6
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
7
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
8
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
9
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
10
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
11
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
12
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
14
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
15
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
16
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
17
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
18
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
19
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
20
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

मागणी वाढूनही दुधाचे भाव जुनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:25 IST

उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात.

ठळक मुद्देगोरस भंडारकडेही गर्दी। पाकीटबंद दुधालाही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने दुधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुधापासून आईस्क्रिम, दही, ताक, लोणी, तूप आदी पदार्थ तयार केले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात शहरी व ग्रामीण भागात मठ्ठा, लस्सी व आईस्क्रीम याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. त्यामुळे दुधाला मोठी मागणी असते.जिल्ह्यात गोरसभंडारचे दूध हे ४० रुपये लिटर दराने विकले जाते. तर यापेक्षा कमी दरात नागरिक थेट ग्रामीण भागातील दूध विक्रेत्यांकडून खरेदी करतात. ग्रामीण भागातूनही शहराला मोठ्या प्रमाणावर दररोज दुधाचा पुरवठा होतो. राज्य सरकारच्या दूध योजनेसाठी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघ सध्या दररोज ८ हजार लिटर दुधाची खरेदी करीत आहे. जिल्हा दूध संघाला दूध खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली असल्याने यापेक्षा जास्त दूध खरेदी करता येता नाही. जिल्ह्याच्या आर्वी, कारंजा, आष्टी आदी भागात मदर डेअरी खरेदी करीत आहे. तर सेलू भागात काही ठिकाणी नागपूर येथील खासगी डेअरी दूध खरेदी आहे.दुधाची मागणी वाढली असली तरी शेतकऱ्यांच्या पदरात २० ते ३० रुपयेच भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी मागणी वाढूनही त्रस्त आहेत. दूध उत्पादकांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्या तुलनेत दुधाचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढत आहेत. शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करून त्यापासून आईस्क्रीम विकणारे लोक मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहे, असा दुग्ध उत्पादक शेतकºयांचा आरोप आहे.दूध उत्पादनाच्या भागात पाकीटावर बंदी घालाराज्यात ज्या भागात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते, त्या भागात खासगी कंपन्यांच्या पाकीटबंद दुधाच्या विक्रीवर बंधने घालावी, ज्यामुळे शेतकºयाच्या दुधाला जादा भाव मिळेल आणि शेतकरी कुटुंबाला याचा लाभ होईल, अशी मागणी एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केली आहे. शेतकरी आरक्षणाच्या अष्टसूत्री कार्यक्रमात त्यांनी या बाबीचा उल्लेख केला आहे. ज्या भागात पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे, त्या भागात पाकीटबंद दूध विक्री पूर्णपणे बंद करणे, सरकारची जबाबदारी आहे. मात्र, खासगी कंपन्यांच्या दबावात सरकार पाकीटबंद दुधाच्या विक्रीवर बंदी आणत नाही. त्यामुळे शेतकºयाच्या दुधाला भाव मिळण्यास अडचण निर्माण होते, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :milkदूध