शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकेच्या बारा शाखांचे विलिनीकरण

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

आर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत

बँकेचा निर्णय : ग्रामीण खातेदार दुरावणार अरविंद काकडे - आकोलीआर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत कानावर येत असताना बँकेच्या बारा शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी धक्कादायक ठरणारा आहे.सहकाराला ग्रामीण भागापर्यंत पोहचावे या हेतूने ग्रामीण भागात बँकेच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांना पतपुरवठा याच शाखांतून होत होता. विजेचे बिल, भरण्याची सुविधा होती. शिक्षकांचे वेतन व ग्रामपंचायतींचे व्यवहारही याच शाखांमधून व्हायचे. त्यामुळे बँकांशी शेतकरी, शेतमजुरांची नाळ घट्ट झाली होती. राज्य शासनाने पॅकेज घोषित केल्यामुळे नव्याने या सुविधांचा लाभ घेता येईल. ही आशा पल्लवीत झाली. असे असताना ग्रामीण भागाशी जुळलेल्या शाखांचे होणारे विलीकरण ग्रामीण खातेदारांत दुरावा निर्माण करणारे आहे.१२ जुलै पासून दिनकरनगर शाखा सेलू शाखेत, ठाणेगाव आणि कन्नमवारग्राम शाखा कारंजा शाखेत, सुतगिरणी शाखा महिला आश्रम वर्धा शाखेत, वायफड शाखा वर्धा शाखेत, मदनी सेवाग्राम शाखेत, कोरा नंदोरी शाखेत, पोहणा शाखा वडनेर शाखेत, तळेगाव(टा.) वायगाव शाखेत, विजयगोपाल शाखा पुलगाव शाखेत, रसुलाबाद शाखा पुलगाव शाखेत आणि पिंपळखुटा शाखा आर्वी शाखेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शाखांचे कर्मचारी सुद्धा यथावकाश त्या-त्या शाखांमध्ये कर्तव्यावर रूजू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार नसल्याने बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र या बँकेत असलेल्या खातेदारांच्या पैशाकरिता मात्र त्यांना ज्या शाखेत त्यांची बँक विलीन झाली त्या बँकेत जावून पैसे आणण्याकरिता चकरा माराच्या लागणार आहे. बँक विलिनीकरणाचा लाभ बँकेला होत असला तरी त्याचा खरा फटका बँकेतील खातेदांना बसणार असल्याचे वास्तव आहे.