शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

सहकारी बँकेच्या बारा शाखांचे विलिनीकरण

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

आर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत

बँकेचा निर्णय : ग्रामीण खातेदार दुरावणार अरविंद काकडे - आकोलीआर्थिक डबघाईस आलेल्या वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाच्या निर्णयाने सुखद दिलासा मिळाला आहे. रिजर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध येत्या एक-दोन दिवसात हटविण्यात येणार असल्याचे शुभसंकेत कानावर येत असताना बँकेच्या बारा शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी धक्कादायक ठरणारा आहे.सहकाराला ग्रामीण भागापर्यंत पोहचावे या हेतूने ग्रामीण भागात बँकेच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांना पतपुरवठा याच शाखांतून होत होता. विजेचे बिल, भरण्याची सुविधा होती. शिक्षकांचे वेतन व ग्रामपंचायतींचे व्यवहारही याच शाखांमधून व्हायचे. त्यामुळे बँकांशी शेतकरी, शेतमजुरांची नाळ घट्ट झाली होती. राज्य शासनाने पॅकेज घोषित केल्यामुळे नव्याने या सुविधांचा लाभ घेता येईल. ही आशा पल्लवीत झाली. असे असताना ग्रामीण भागाशी जुळलेल्या शाखांचे होणारे विलीकरण ग्रामीण खातेदारांत दुरावा निर्माण करणारे आहे.१२ जुलै पासून दिनकरनगर शाखा सेलू शाखेत, ठाणेगाव आणि कन्नमवारग्राम शाखा कारंजा शाखेत, सुतगिरणी शाखा महिला आश्रम वर्धा शाखेत, वायफड शाखा वर्धा शाखेत, मदनी सेवाग्राम शाखेत, कोरा नंदोरी शाखेत, पोहणा शाखा वडनेर शाखेत, तळेगाव(टा.) वायगाव शाखेत, विजयगोपाल शाखा पुलगाव शाखेत, रसुलाबाद शाखा पुलगाव शाखेत आणि पिंपळखुटा शाखा आर्वी शाखेत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शाखांचे कर्मचारी सुद्धा यथावकाश त्या-त्या शाखांमध्ये कर्तव्यावर रूजू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार नसल्याने बँकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र या बँकेत असलेल्या खातेदारांच्या पैशाकरिता मात्र त्यांना ज्या शाखेत त्यांची बँक विलीन झाली त्या बँकेत जावून पैसे आणण्याकरिता चकरा माराच्या लागणार आहे. बँक विलिनीकरणाचा लाभ बँकेला होत असला तरी त्याचा खरा फटका बँकेतील खातेदांना बसणार असल्याचे वास्तव आहे.