शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मार्च अखेरीसच पारा @ ४२

By admin | Updated: March 26, 2017 00:58 IST

उन्हाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्याचा पहिला महिना म्हणून ओळख असलेला मार्च महिना संपत असतानाच शनिवारी पारा ४२ अंशावर पोहोचला.

दुपारी उष्ण झळा : पारा घसरण्याची शक्यता कमीच वर्धा : उन्हाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्याचा पहिला महिना म्हणून ओळख असलेला मार्च महिना संपत असतानाच शनिवारी पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हाळ्याच्या हिटचा महिना म्हणून ओळख असलेला एप्रिल आणि मे अद्याप बाकी आहे. या महिन्यात पारा नेमका कितीवर जाईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवसात पाऱ्यात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गत चार दिवसात या पाऱ्याने ३४ अंशावरून थेट झेप घेत ४२ अंश गाठला. यामुळे येत्या दिवसात उन्ह आणखी भडकण्याची शक्यता आहे. या चढत्या पाऱ्यामुळे दिवसा रस्त्यावरील वर्दळ विरळ होत असल्याचे दिसून आले आहे. तर रस्त्यावर काही कामानिमित्त निघणारे उन्हापासून बचावाकरिता डोक्याला बांधूनच निघत असल्याचे रस्त्याने दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात कुठलाही बदल होण्याचे संकेत नसल्याने पाऱ्यातील असलेला चढ कायमच राहणार असल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही वातावरणाच्या दबावाचा पट्टा तयार होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे; मात्र वास्तविकतेत तसा कुठलाही दबावाचा पट्टा तयार होणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत नसल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा पाऊस येईपर्यंत उन्हाचे चटके कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी) किमान तापमानात होणारी वाढ धोक्याची जिल्ह्यात कमाल तापमानाने भडका घेतल्याच्या नोंदी आहेत; मात्र या नोंदीसोबत प्रत्येक वर्षाला किमान तापमानही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही वाढत प्रत्येक वर्षाला वाढतच जात असल्याचे दिसून आले आहे. कमाल तापमान वाढल्यास दिवसभर उकाडा जाणवतो तर किमान तापमान कमी असल्यास रात्रीला थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो; मात्र जिल्ह्यात गत दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. शनिवारी जिल्ह्यात किमान तापमान २४.७ अंशावर नोंदविल्या गेले. तर ही नोंद गत तीन दिवसांपासून सतत आहे. कमाल आणि किमान तापमानात असलेले अंतर कमी होत असल्याने उन्हाचे चटके अधिक जाणवत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.