शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

मार्च अखेरीसच पारा @ ४२

By admin | Updated: March 26, 2017 00:58 IST

उन्हाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्याचा पहिला महिना म्हणून ओळख असलेला मार्च महिना संपत असतानाच शनिवारी पारा ४२ अंशावर पोहोचला.

दुपारी उष्ण झळा : पारा घसरण्याची शक्यता कमीच वर्धा : उन्हाळ्याला जेमतेम प्रारंभ झाला आहे. उन्हाळ्याचा पहिला महिना म्हणून ओळख असलेला मार्च महिना संपत असतानाच शनिवारी पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हाळ्याच्या हिटचा महिना म्हणून ओळख असलेला एप्रिल आणि मे अद्याप बाकी आहे. या महिन्यात पारा नेमका कितीवर जाईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवसात पाऱ्यात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गत चार दिवसात या पाऱ्याने ३४ अंशावरून थेट झेप घेत ४२ अंश गाठला. यामुळे येत्या दिवसात उन्ह आणखी भडकण्याची शक्यता आहे. या चढत्या पाऱ्यामुळे दिवसा रस्त्यावरील वर्दळ विरळ होत असल्याचे दिसून आले आहे. तर रस्त्यावर काही कामानिमित्त निघणारे उन्हापासून बचावाकरिता डोक्याला बांधूनच निघत असल्याचे रस्त्याने दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात कुठलाही बदल होण्याचे संकेत नसल्याने पाऱ्यातील असलेला चढ कायमच राहणार असल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. दर वर्षी प्रमाणे यंदाही वातावरणाच्या दबावाचा पट्टा तयार होणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे; मात्र वास्तविकतेत तसा कुठलाही दबावाचा पट्टा तयार होणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत नसल्याचे वर्धेच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा पाऊस येईपर्यंत उन्हाचे चटके कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी) किमान तापमानात होणारी वाढ धोक्याची जिल्ह्यात कमाल तापमानाने भडका घेतल्याच्या नोंदी आहेत; मात्र या नोंदीसोबत प्रत्येक वर्षाला किमान तापमानही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ही वाढत प्रत्येक वर्षाला वाढतच जात असल्याचे दिसून आले आहे. कमाल तापमान वाढल्यास दिवसभर उकाडा जाणवतो तर किमान तापमान कमी असल्यास रात्रीला थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो; मात्र जिल्ह्यात गत दोन तीन वर्षापासून जिल्ह्यात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत आहे. शनिवारी जिल्ह्यात किमान तापमान २४.७ अंशावर नोंदविल्या गेले. तर ही नोंद गत तीन दिवसांपासून सतत आहे. कमाल आणि किमान तापमानात असलेले अंतर कमी होत असल्याने उन्हाचे चटके अधिक जाणवत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.