शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पारा ४६ पार; संत्राबागा सरपणाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:30 IST

तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : शासकीय मदतीची मागणी

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु, मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला नाही. अशातच शेतकºयांनी जीवाचा आटापीटा करून संत्रा बागा वाचविल्या. मात्र, सध्या शेतातील अनेक विहिरी कोरड्या झाल्याने आणि पाराही ४६ पार गेल्याने संत्र्याची झाडे करपण्यास सुरूवात झाली आहे.काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून संत्रा बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; पण सध्या टँकरही सहज उपलब्ध होत नसल्याचे शेतकरी सांगतात. येत्या काही दिवसात मान्सून वर्ध्यात दाखल होत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी मान्सून लांबल्यास तालुक्यातील संत्राच्या संपूर्ण बागा नष्ट होण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.बागेत १२०० संत्र्याची झाडे आहेत; पण सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सध्या सोयाव्या लागत आहे. प्रखर उन्हामुळे संत्रा झाडे करपत आहेत. अशातच शेतातील विहिरीनेही तळ गाठल्याने शेतातील संत्रा झाडे कशी जगवावी, हा प्रश्न सध्या भेडसावत आहे.- हनुमंत पठाडे, माजी सरपंच, सेलगाव (ल.).कारंजा तालुक्यात १९०० हेक्टर जमीन ही संत्रा पिकाखाली आहे. अतिउष्णतेमुळे व पाण्याअभावी संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, शासनाकडून कुठलेही आदेश अजूनपर्यंत आलेले नाहीत.- विजय मंहत, तालुका कृषी अधिकारी, कारंजा (घा.).

टॅग्स :Temperatureतापमान