शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

पारा ४६ पार; संत्राबागा सरपणाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:30 IST

तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : शासकीय मदतीची मागणी

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यातील अनेक शेतकरी संत्र्याचे उत्पादन घेतात. परंतु सध्या पारा ४६ अंशाच्या वर गेल्याने त्याचे विपरीत परिणाम झाडांवर दिसून येत आहेत. उष्णतामानामुळे अनेक झाडे सरपण होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु, मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला नाही. अशातच शेतकºयांनी जीवाचा आटापीटा करून संत्रा बागा वाचविल्या. मात्र, सध्या शेतातील अनेक विहिरी कोरड्या झाल्याने आणि पाराही ४६ पार गेल्याने संत्र्याची झाडे करपण्यास सुरूवात झाली आहे.काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणून संत्रा बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; पण सध्या टँकरही सहज उपलब्ध होत नसल्याचे शेतकरी सांगतात. येत्या काही दिवसात मान्सून वर्ध्यात दाखल होत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी मान्सून लांबल्यास तालुक्यातील संत्राच्या संपूर्ण बागा नष्ट होण्याची भीती शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.बागेत १२०० संत्र्याची झाडे आहेत; पण सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा सध्या सोयाव्या लागत आहे. प्रखर उन्हामुळे संत्रा झाडे करपत आहेत. अशातच शेतातील विहिरीनेही तळ गाठल्याने शेतातील संत्रा झाडे कशी जगवावी, हा प्रश्न सध्या भेडसावत आहे.- हनुमंत पठाडे, माजी सरपंच, सेलगाव (ल.).कारंजा तालुक्यात १९०० हेक्टर जमीन ही संत्रा पिकाखाली आहे. अतिउष्णतेमुळे व पाण्याअभावी संत्रा बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, शासनाकडून कुठलेही आदेश अजूनपर्यंत आलेले नाहीत.- विजय मंहत, तालुका कृषी अधिकारी, कारंजा (घा.).

टॅग्स :Temperatureतापमान