शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पारा ९.०१ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:23 IST

नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला.

ठळक मुद्देजिल्ह्यात गारठा वाढला : उत्तरेकडील वारे सक्रिय

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला. उत्तर भारतात बर्फवृष्टीला प्रारंभ होताच विदर्भ प्रांतात थंडीला सुरूवात होईल, असा अंदाज हवामान खात्याच्या वैज्ञानिकांनी वर्तविला आहे.बुधवारी सकाळी वर्धेत ९.०१ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी रात्रीचे तापमान १२.०१ अंश होते. मागील ३ ते ४ दिवसांपासून तापमानात घट होत असल्याचे नोंदीवरून दिसून येते. यापूर्वी जिल्ह्यात हिवाळ्यामध्ये किमान तापमान ५.८ अंशांपर्यंत नोंदविले गेले आहे. यंदा सर्वात कमी तापमान बुधवारी सकाळी नोंदविण्यात आले. दिवाळीनंतर थंडी सुरू होत असे; पण काही वर्षांपासून थंडीला नोव्हेंबर अखेर सुरूवात होत आहे. थंडीचा कडाका सुरू होताच शहरातील वर्दळही रात्रीनंतर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी आलेल्या ओखी वादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे अडत होते. परिणामी, विदर्भ प्रांतातील थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे दिसून येत होते. आता वातावरणातील हा अडथळा दूर झाल्याने थंडी कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय पारा यापेक्षाही खाली जाण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घटउत्तर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे एकाएकी तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान १२.२ अंश सेल्सीयस होते. बुधवारी सकाळी हाच पारा ३ अंशांनी खाली उतरला. आजचे सकाळचे किमान तापमान ९.०१ अंश सेल्सीयस नोंदविले, अशी माहिती हवामानाचे अभ्यासक नितीन डोंगरे यांनी दिली.शेतीसाठी पोषकशेतीकरिता सध्याची थंडी पोषक आहे. विशेषत: रबी हंमागातील गहू आणि चणा पिकांना हा गारठा उपयुक्त आहे. यामुळे सध्या सुरू झालेल्या थंडीच्या कडाक्याचा परिणाम शेतीवर होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.