शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकरी हक्क परिषदेसाठी सभा

By admin | Updated: April 13, 2017 01:47 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी

वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने १६ एप्रिल ला लोक महाविद्यालय, वर्धा येथे दुपारी १२ वाजता आयोजित या परिषदेची माहिती देण्यासाठी विश्रामभवन येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, रामराव मुडे, वसंता मुजबैले, हेमकांत वरटकर, समीर महाकाळकर, अरविंद थूल, पांडूरंग येळणे, डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. घाम व रक्त गाळून पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवून, शेतकरी व त्याची तरणीताठी पोरं आत्महत्या करीत आहे. विद्यमान सरकार कुणालाही न जुमानता शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नवनगर निर्मितीच्या नावावर लँडपूलींग करुन फुकटात जमिनी हडपत आहे. या सरकारच्या काळात दोन वर्षात आजपर्यंत ९ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, त्यामुळे ही परिषद घेण्यात येणार असून या समस्यांना वाचा फोडायची आहे, अशी माहिती प्रा. गमे, अ‍ॅड. धोटे यांनी दिली. महात्मा फुले समता परिषदेच्या या शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे दीड भावाचा किमान हमीभावाचा कायदा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमी संपादनत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला प्रवीण धलवार, अशोक येंगडे, राजेंद्र ठोंबरे, इंद्रपाल गायकवाड आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)