शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हक्क परिषदेसाठी सभा

By admin | Updated: April 13, 2017 01:47 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी

वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने १६ एप्रिल ला लोक महाविद्यालय, वर्धा येथे दुपारी १२ वाजता आयोजित या परिषदेची माहिती देण्यासाठी विश्रामभवन येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, रामराव मुडे, वसंता मुजबैले, हेमकांत वरटकर, समीर महाकाळकर, अरविंद थूल, पांडूरंग येळणे, डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. घाम व रक्त गाळून पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवून, शेतकरी व त्याची तरणीताठी पोरं आत्महत्या करीत आहे. विद्यमान सरकार कुणालाही न जुमानता शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नवनगर निर्मितीच्या नावावर लँडपूलींग करुन फुकटात जमिनी हडपत आहे. या सरकारच्या काळात दोन वर्षात आजपर्यंत ९ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, त्यामुळे ही परिषद घेण्यात येणार असून या समस्यांना वाचा फोडायची आहे, अशी माहिती प्रा. गमे, अ‍ॅड. धोटे यांनी दिली. महात्मा फुले समता परिषदेच्या या शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे दीड भावाचा किमान हमीभावाचा कायदा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमी संपादनत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला प्रवीण धलवार, अशोक येंगडे, राजेंद्र ठोंबरे, इंद्रपाल गायकवाड आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)