शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

शेतकरी हक्क परिषदेसाठी सभा

By admin | Updated: April 13, 2017 01:47 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी

वर्धा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सरकारच्या बेबंदशाही धोरणाचा विरोध तसेच विविध समस्यांना वकहा फोडण्यासाठी शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत आहे. महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने १६ एप्रिल ला लोक महाविद्यालय, वर्धा येथे दुपारी १२ वाजता आयोजित या परिषदेची माहिती देण्यासाठी विश्रामभवन येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, रामराव मुडे, वसंता मुजबैले, हेमकांत वरटकर, समीर महाकाळकर, अरविंद थूल, पांडूरंग येळणे, डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. घाम व रक्त गाळून पिकविलेल्या शेतमालाला भाव नाही. डोक्यावर कर्जाचा डोंगर घेवून, शेतकरी व त्याची तरणीताठी पोरं आत्महत्या करीत आहे. विद्यमान सरकार कुणालाही न जुमानता शेतकऱ्यांशी दुजाभाव करीत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व नवनगर निर्मितीच्या नावावर लँडपूलींग करुन फुकटात जमिनी हडपत आहे. या सरकारच्या काळात दोन वर्षात आजपर्यंत ९ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास नकार देत आहे, त्यामुळे ही परिषद घेण्यात येणार असून या समस्यांना वाचा फोडायची आहे, अशी माहिती प्रा. गमे, अ‍ॅड. धोटे यांनी दिली. महात्मा फुले समता परिषदेच्या या शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे दीड भावाचा किमान हमीभावाचा कायदा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूमी संपादनत शासनाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला प्रवीण धलवार, अशोक येंगडे, राजेंद्र ठोंबरे, इंद्रपाल गायकवाड आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)