शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात उपाययोजनांचा दुष्काळ

By admin | Updated: May 25, 2017 01:06 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात विक्री जोरात : कारवाई करणारेही घेतात बघ्याची भूमिका लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे. मात्र, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या उपाययोजनांचा दुष्काळ दारूबंदीच्या जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लहान गावातही अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. लग्नसराईचा मोसम सध्या सुरू असल्याने दारूची विक्रीही मुबलक प्रमाणात वाढली आहे. राज्यात सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये गडचिरोली जिल्हा दारूबंदी करण्यात आला. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करताना वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या दोन जिल्ह्यात अंमलबजावणीत राहिलेल्या उणीवा शोधण्यात आल्या व त्यावर उपाय योजना करून चंद्रपूरच्या दारूबंदीला मुहूर्तरूप देण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने या तिन जिल्ह्याच्या दारूबंदी झोनसाठी फारशा उपाययोजना केल्या नाहीत. दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेपासून २५ कि.मी. अंतरावरचे दुकान बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांची पूर्तता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रमाणात झाली; पण आता पुन्हा रस्त्याचे मालकी हक्क बदलवून हे दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात फिरत्या प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सुरू केल्या जाणार होत्या. केवळ चंद्रपूर जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा निर्माण केली जात आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून सरकारजमा करण्याची कारवाई गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली. मात्र, वर्धेत अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक गावात दारूबंदीच्या विरूद्ध कमेटी तयार करण्याच्या शासन निर्णयावर ही अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. एकूणच अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग कमी पडत आहे.गांधी विनोबांच्या गावातही दारूचा महापूरमहात्मा गांधी याची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू उपलब्ध होत आहे. अनेक ठिकाणी दारूच्या शिश्या पडलेल्या दिसून येत आहे. तसेच वर्धा शहरातही अनेक शासकीय कार्यालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच पडलेला दिसून येतो. विनोबा भावे यांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पवनार गावात नदीच्या किनाऱ्यावरच गावठी दारूच्या भट्या सुरू आहेत. त्यामुळे पवनार हे गाव गावठी दारू विक्रीचे मुख्य केंद्र झाले आहे.