शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात उपाययोजनांचा दुष्काळ

By admin | Updated: May 25, 2017 01:06 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात विक्री जोरात : कारवाई करणारेही घेतात बघ्याची भूमिका लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा मिळून दारूबंदी झोन निर्माण करण्यात आला आहे. मात्र, अवैध दारूविक्री रोखण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या उपाययोजनांचा दुष्काळ दारूबंदीच्या जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लहान गावातही अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. लग्नसराईचा मोसम सध्या सुरू असल्याने दारूची विक्रीही मुबलक प्रमाणात वाढली आहे. राज्यात सर्वात प्रथम वर्धा जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये गडचिरोली जिल्हा दारूबंदी करण्यात आला. १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करताना वर्धा व गडचिरोली जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या दोन जिल्ह्यात अंमलबजावणीत राहिलेल्या उणीवा शोधण्यात आल्या व त्यावर उपाय योजना करून चंद्रपूरच्या दारूबंदीला मुहूर्तरूप देण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने या तिन जिल्ह्याच्या दारूबंदी झोनसाठी फारशा उपाययोजना केल्या नाहीत. दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या सिमेपासून २५ कि.मी. अंतरावरचे दुकान बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांची पूर्तता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही प्रमाणात झाली; पण आता पुन्हा रस्त्याचे मालकी हक्क बदलवून हे दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच दारूबंदीच्या जिल्ह्यात फिरत्या प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सुरू केल्या जाणार होत्या. केवळ चंद्रपूर जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा निर्माण केली जात आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने जप्त करून सरकारजमा करण्याची कारवाई गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली. मात्र, वर्धेत अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक गावात दारूबंदीच्या विरूद्ध कमेटी तयार करण्याच्या शासन निर्णयावर ही अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. एकूणच अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभाग कमी पडत आहे.गांधी विनोबांच्या गावातही दारूचा महापूरमहात्मा गांधी याची कर्मभूमी असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू उपलब्ध होत आहे. अनेक ठिकाणी दारूच्या शिश्या पडलेल्या दिसून येत आहे. तसेच वर्धा शहरातही अनेक शासकीय कार्यालय परिसरात दारूच्या बॉटलचा खच पडलेला दिसून येतो. विनोबा भावे यांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पवनार गावात नदीच्या किनाऱ्यावरच गावठी दारूच्या भट्या सुरू आहेत. त्यामुळे पवनार हे गाव गावठी दारू विक्रीचे मुख्य केंद्र झाले आहे.