शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मावा, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला

By admin | Updated: September 12, 2016 00:45 IST

पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.

पावसाची प्रतीक्षा संपता संपेना : कपाशी धोक्यात; रस शोषणाऱ्या किडींमुळे वाढ खुंटली वर्धा : पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. सोयाबीन हातचे गेल्याची स्थिती असताना कपाशीवर मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगने एकत्रीत हल्ला चढविल्याने कपाशीचे उत्पन्नही हातचे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे यंदाही शेतकऱ्याला निसर्र्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागणार असल्याचे वास्तव जिल्ह्यात निमाण झाले आहे. प्रारंभी मारलेली दडी व नंतर लागून पडलेला पाऊस यामुळे पेरणीला विलंब झाला. यात साधलेल्या पेरणीतून उत्पन्नाची आशा असतानाच नेमक्या वेळी पुन्हा पावसाने दडी मारली आहे. गत महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. कपाशीवर एकाच वेळी मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला होत असल्याने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. ही कीड झाडातील रस शोषत असल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे वाकत आहेत. परिणामी झाडांची वाढ खुंटत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कपाशीवर या तीन किडींसह चुरडाही येण्याची शक्यता बळावली आहे. चुरड्यामुळे फूल व बोंडावर विपरित परिणाम होवून उत्पन्नात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा सर्व प्रकार पावसाच्या दडीने होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. यावर उपाय म्हणून आंतर प्रवाही कीड नाशकाची फवारणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे; मात्र जोपर्यत पिकांकरिता दमदार पाऊस येणार नाही तोपर्यंत पीक तग धरणार नसल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी ओलीत करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांची अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांच्या आशा आता आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.(प्रतिनिधी) येत्या दिवसांत फूल किडींची शक्यता सध्या कपाशीवर एकाचवेळी तीन किडींनी हल्ला चढविला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. हा सर्व प्रकार पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या किडींवर उपाय योजना आखणे सुरू आहे, पण त्याचा विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत कपाशीवर फूल खाणाऱ्या किडीचा प्रादूर्भावही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीमुळे कपाशीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या आभाळाकडे नजरा पिकांची होत असलेली दैना केवळ पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशात अनेक दिवसांपासून ढग कायम असले तरी पावसाचा थेंब पडायला तयार नाही. पीक वाचविण्याकरिता पावसाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.पावसाशिवाय काहीच पर्याय नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.