शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मावा, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला

By admin | Updated: September 12, 2016 00:45 IST

पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.

पावसाची प्रतीक्षा संपता संपेना : कपाशी धोक्यात; रस शोषणाऱ्या किडींमुळे वाढ खुंटली वर्धा : पिकांना गरज असताना पावसाने मारलेल्या दडीमुळे पिकांवर अनेक किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. सोयाबीन हातचे गेल्याची स्थिती असताना कपाशीवर मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगने एकत्रीत हल्ला चढविल्याने कपाशीचे उत्पन्नही हातचे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे यंदाही शेतकऱ्याला निसर्र्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागणार असल्याचे वास्तव जिल्ह्यात निमाण झाले आहे. प्रारंभी मारलेली दडी व नंतर लागून पडलेला पाऊस यामुळे पेरणीला विलंब झाला. यात साधलेल्या पेरणीतून उत्पन्नाची आशा असतानाच नेमक्या वेळी पुन्हा पावसाने दडी मारली आहे. गत महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे. कपाशीवर एकाच वेळी मावा तुडतुडे, पांढरी माशी व मिलिबगचा हल्ला होत असल्याने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. ही कीड झाडातील रस शोषत असल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे वाकत आहेत. परिणामी झाडांची वाढ खुंटत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास कपाशीवर या तीन किडींसह चुरडाही येण्याची शक्यता बळावली आहे. चुरड्यामुळे फूल व बोंडावर विपरित परिणाम होवून उत्पन्नात घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. हा सर्व प्रकार पावसाच्या दडीने होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत. यावर उपाय म्हणून आंतर प्रवाही कीड नाशकाची फवारणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे; मात्र जोपर्यत पिकांकरिता दमदार पाऊस येणार नाही तोपर्यंत पीक तग धरणार नसल्याचे बोलले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी ओलीत करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही त्यांची अडचण होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांच्या आशा आता आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.(प्रतिनिधी) येत्या दिवसांत फूल किडींची शक्यता सध्या कपाशीवर एकाचवेळी तीन किडींनी हल्ला चढविला आहे. यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. हा सर्व प्रकार पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. या किडींवर उपाय योजना आखणे सुरू आहे, पण त्याचा विशेष परिणाम होत नसल्याचे दिसून आले आहे. ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत कपाशीवर फूल खाणाऱ्या किडीचा प्रादूर्भावही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीमुळे कपाशीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या आभाळाकडे नजरा पिकांची होत असलेली दैना केवळ पावसाच्या दडीमुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाशात अनेक दिवसांपासून ढग कायम असले तरी पावसाचा थेंब पडायला तयार नाही. पीक वाचविण्याकरिता पावसाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.पावसाशिवाय काहीच पर्याय नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.