शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:47 IST

विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचा मानस : भाविकांना मिळणार सुविधा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांतील एकूण २७२ बसेसपैकी जास्तीत जास्त २५० बसेसचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्या वर्धा जिल्ह्यातील विविध भागांसह जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात. तसेच काही बसेस वर्धा होत पंढरपूरच्या दिशेने नेहमीच सोडल्या जातात. परंतु, आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी राहात असल्याने त्यांना सुविधा व्हावी या दृष्टीने या काळात रापम विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करते. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा विभागाकडून सुमारे ५० बसेस पंढरपूरला पाठविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तर मागील वर्षी ही संख्या ४४ च्या घरात होती. तेव्हा बºयापैकी उत्पन्न रापमच्या वर्धा विभागाला झाल्याचे सांगण्यात आले.प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत घेतली जाणार दक्षतारापमच्या वर्धा विभागाकडे एकूण २७२ बसेस आहेत. त्यापैकी २५० बसेसचे नियोजन जिल्ह्यातील पाच आगारातून करून त्या बसेस विविध गावांच्या दिशेने पाठविल्या जातात. तब्बल ५० बसेस पंढरपूरला पाठविताना कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेत काही बसफेºया रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.६० टक्क्यांवर मिळते भारमानमागीलवर्षी ४४ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पंढरपूरला सोडण्याचा मानस रापमच्या वर्धा विभागाचा आहे. त्या दृष्टीने सध्या पाऊलही पडत आहेत. मागीलवर्षी पंढरपूरसाठी सोडण्यात आलेल्या बसेसला ६० टक्क्यांवर भारमान मिळाले होते. तर यंदाही ६० टक्क्यांवर भारमान मिळेल, अशी अपेक्षा रापमच्या अधिकाºयांना आहे.सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहक व चालकांवर होणार कारवाईआषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला पाठविण्यात येणाºया बसेसमध्ये वाहक व चालक राहणार आहेत. त्यांनी काय करावे, याबाबतच्या सूचना त्यांना वरिष्ठांकडून पूर्वीच देण्यात येणार आहे. मात्र, रापमचा जो कर्मचारी या सूचनांना पाठ दाखवेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी पाठविल्या ४४ बसेसआषाढी एकादशीचे औचित्य साधून अनेक भाविक पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जातात. त्यात वर्धा जिल्ह्यातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मागीलवर्षी तब्बल ४४ बसेस रापमच्या वर्धा विभागाने भाविकांना सुविधा होईल या हेतूने पंढरपूरला पाठविल्या होत्या.आषाढी एकादशीनिमित्त मागीलवर्षी ४४ बसेस पंढरपूरला पाठविल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पाठविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच्या नियोजनाला अंतिम रूप सध्या दिले जात आहे.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रापम वर्धा.