शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:47 IST

विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाचा मानस : भाविकांना मिळणार सुविधा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांतील एकूण २७२ बसेसपैकी जास्तीत जास्त २५० बसेसचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्या वर्धा जिल्ह्यातील विविध भागांसह जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात. तसेच काही बसेस वर्धा होत पंढरपूरच्या दिशेने नेहमीच सोडल्या जातात. परंतु, आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी राहात असल्याने त्यांना सुविधा व्हावी या दृष्टीने या काळात रापम विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करते. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा विभागाकडून सुमारे ५० बसेस पंढरपूरला पाठविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तर मागील वर्षी ही संख्या ४४ च्या घरात होती. तेव्हा बºयापैकी उत्पन्न रापमच्या वर्धा विभागाला झाल्याचे सांगण्यात आले.प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत घेतली जाणार दक्षतारापमच्या वर्धा विभागाकडे एकूण २७२ बसेस आहेत. त्यापैकी २५० बसेसचे नियोजन जिल्ह्यातील पाच आगारातून करून त्या बसेस विविध गावांच्या दिशेने पाठविल्या जातात. तब्बल ५० बसेस पंढरपूरला पाठविताना कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेत काही बसफेºया रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.६० टक्क्यांवर मिळते भारमानमागीलवर्षी ४४ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पंढरपूरला सोडण्याचा मानस रापमच्या वर्धा विभागाचा आहे. त्या दृष्टीने सध्या पाऊलही पडत आहेत. मागीलवर्षी पंढरपूरसाठी सोडण्यात आलेल्या बसेसला ६० टक्क्यांवर भारमान मिळाले होते. तर यंदाही ६० टक्क्यांवर भारमान मिळेल, अशी अपेक्षा रापमच्या अधिकाºयांना आहे.सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहक व चालकांवर होणार कारवाईआषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला पाठविण्यात येणाºया बसेसमध्ये वाहक व चालक राहणार आहेत. त्यांनी काय करावे, याबाबतच्या सूचना त्यांना वरिष्ठांकडून पूर्वीच देण्यात येणार आहे. मात्र, रापमचा जो कर्मचारी या सूचनांना पाठ दाखवेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी पाठविल्या ४४ बसेसआषाढी एकादशीचे औचित्य साधून अनेक भाविक पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जातात. त्यात वर्धा जिल्ह्यातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मागीलवर्षी तब्बल ४४ बसेस रापमच्या वर्धा विभागाने भाविकांना सुविधा होईल या हेतूने पंढरपूरला पाठविल्या होत्या.आषाढी एकादशीनिमित्त मागीलवर्षी ४४ बसेस पंढरपूरला पाठविल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पाठविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच्या नियोजनाला अंतिम रूप सध्या दिले जात आहे.- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रापम वर्धा.