शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मतविभाजनाने बिघडले दिग्गजांचे गणित

By admin | Updated: October 19, 2014 23:58 IST

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू

वर्धेत काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे विजयाचे गणित जुळत होते. सेलू तालुक्यात त्यांचे चांगले प्राबल्य आहे. अशातच भाजपमध्ये बंड झाल्याने राणा रणनवरे रिंगणात उतरले. त्यांचा डोळाही सेलू तालुक्यातील मतांवरच होता. त्यांनी घेतलेल्या मतांमध्ये बहुतांश मते सेलू तालुक्यातील आहे. याचा फटका शेखर शेंडे यांना बसला. आर्वीत अमर काळे हे केवळ ३ हजार १४३ मतांनी विजयी झाले. येथे भाजपाचे दादाराव केचे निवडून येतील असे चित्र होते. मात्र गेल्या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे या निवडणुकीत मैदानात होते. यामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाल्याने दादाराव केचे यांना त्याची मोठी किमत मोजावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप काळे यांनी ३ हजार ८६१ मते घेतली. शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी २ हजार १७४ मते घेतली, तर बाळा जगताप यांनी ३ हजार ६४२ मते घेतल्याने भाजपचे गणित बिघडवले.हिंगणघाटात समीर कुणावार यांना आमदार करायचे हे आधीच हिंगणघाटातील मतदारांनी ठरवले होते. असले तरी दिग्गज तिसऱ्या व चवथ्या क्रमांकावर फेकले जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. या निवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि मनसेने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मनसुबे पार धुळीस मिळविले.देवळीत तोंडचा घास गेलादेवळीत काँग्रेसचे रणजित कांबळे यांचा निसटता विजय झाला. त्यामागेही मतांचे विभाजन हेच कारण आहे. बसपाचे उमेश म्हैसकर यांच्या मतांवर काँग्रेसची भिस्त होती. म्हैसकर यांनी तिसऱ्या क्रमाकांची मते घेतल्यामुळे काँग्रेसला विजयासाठी शेवटच्या फेरीत चमत्कार घडवावा लागला. यात राकाँचे शशांक घोडमारे यांना ६ हजार ३४३ मते घेऊन भरच टाकली. त्यातच शिवसेनेचे डॉ. निलेश गुल्हाणे यांची उमेदवारी नसती तर भाजपाचे सुरेश वाघमारे यांच्या तोंडून विजयाचा घास हिसकावता आला नसता.