शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

सेंद्रिय कापसापासून बनवलेले मास्क पोहचले इंग्लंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:41 IST

गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केलेत. हे मास्क आज सातासमुद्रापार पोहोचले आहेत.

ठळक मुद्देवर्ध्याच्या ग्राम सेवा मंडळाची निर्मिती कोरोना लढ्यातही योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनाच मास्क घालून बहुधा सर्वांनीच चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेले असेल. कोरोनाने जगभरात थैमान घातले आणि मास्कचा वापर, पर्यायाने मागणीही वाढली. मास्क निर्मितीत विविध संस्था, कंपन्या उतरल्या. गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केलेत. हे मास्क आज सातासमुद्रापार पोहोचले आहेत.

मार्च महिन्यात भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. विषाणूपासून सुरक्षेसाठी मास्कची मागणी वाढली. गोपुरी येथील ग्राम सेवा मंडळाने अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना सुरुवातीला मास्कचे नमुने पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला उतरले आणि हळूहळू मागणी वाढू लागली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये विशेष रुची दाखविली. मास्कच्या आता चांगल्या ऑर्डर तेथे मिळत असून सेंद्रिय कापसापासून निर्मित खादीच्या मास्कचा इंग्लंड प्रवास सुरू झाला आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला. आता कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाºया खादीने मास्कच्या रूपात कोरोनाच्या लढ्यातही योगदान दिले आहे.

खादीने उघडली रोजगाराची दालनेसेंद्रिय कापसाचा हा मास्क दिलेल्या इंग्लंडमधून पाठविलेल्या डिझाईननुसार मापातच तंतोतंत शिवावा लागतो. त्यावर अतिशय बारीक काम करावे लागते. एक मास्क शिवायला जवळपास २० ते ३० मिनिटे लागतात, असे कारागीर गणेश खांडसकर यांनी सांगितले. कोरोना संकटकाळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला, ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनल्याचे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.

खादी मास्क जपतेय वेगळेपण१९३४ मध्ये भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांतून हे मंडळ उदयास आले. येथे कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईचेदेखील काम केलेजाते. बाजारपेठेत वैविध्यपूर्ण मास्क उपलब्ध असले तरी खादीपासून निर्मित हे मास्क आपलं वेगळंपण जपून आहेत.

जवळपास एक महिना बारीक काम केल्यावर इंग्लंड येथे मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन आॅर्डर मिळतील, असा विश्वास आहे.करुणा फुटाणे, अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा.

 

टॅग्स :Khadiखादी