शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

सेंद्रिय कापसापासून बनवलेले मास्क पोहचले इंग्लंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:41 IST

गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केलेत. हे मास्क आज सातासमुद्रापार पोहोचले आहेत.

ठळक मुद्देवर्ध्याच्या ग्राम सेवा मंडळाची निर्मिती कोरोना लढ्यातही योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनाच मास्क घालून बहुधा सर्वांनीच चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेले असेल. कोरोनाने जगभरात थैमान घातले आणि मास्कचा वापर, पर्यायाने मागणीही वाढली. मास्क निर्मितीत विविध संस्था, कंपन्या उतरल्या. गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल पुढे टाकत देशी (सेंद्रिय) कापसापासून मास्क तयार केलेत. हे मास्क आज सातासमुद्रापार पोहोचले आहेत.

मार्च महिन्यात भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. विषाणूपासून सुरक्षेसाठी मास्कची मागणी वाढली. गोपुरी येथील ग्राम सेवा मंडळाने अस्सल सेंद्रिय कापसाच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना सुरुवातीला मास्कचे नमुने पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला उतरले आणि हळूहळू मागणी वाढू लागली. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आणि ग्रामसेवा मंडळाशी जुळलेले किशोर शहा व त्यांच्या मित्र परिवाराने या मास्कमध्ये विशेष रुची दाखविली. मास्कच्या आता चांगल्या ऑर्डर तेथे मिळत असून सेंद्रिय कापसापासून निर्मित खादीच्या मास्कचा इंग्लंड प्रवास सुरू झाला आहे. स्वातंत्र्यलढ्यात खादीने बंडाचा झेंडा रोवला. आता कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाºया खादीने मास्कच्या रूपात कोरोनाच्या लढ्यातही योगदान दिले आहे.

खादीने उघडली रोजगाराची दालनेसेंद्रिय कापसाचा हा मास्क दिलेल्या इंग्लंडमधून पाठविलेल्या डिझाईननुसार मापातच तंतोतंत शिवावा लागतो. त्यावर अतिशय बारीक काम करावे लागते. एक मास्क शिवायला जवळपास २० ते ३० मिनिटे लागतात, असे कारागीर गणेश खांडसकर यांनी सांगितले. कोरोना संकटकाळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला, ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनल्याचे ते लोकमतशी बोलताना म्हणाले.

खादी मास्क जपतेय वेगळेपण१९३४ मध्ये भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांतून हे मंडळ उदयास आले. येथे कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईचेदेखील काम केलेजाते. बाजारपेठेत वैविध्यपूर्ण मास्क उपलब्ध असले तरी खादीपासून निर्मित हे मास्क आपलं वेगळंपण जपून आहेत.

जवळपास एक महिना बारीक काम केल्यावर इंग्लंड येथे मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन आॅर्डर मिळतील, असा विश्वास आहे.करुणा फुटाणे, अध्यक्ष, ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा.

 

टॅग्स :Khadiखादी