शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

सामाजिक दायित्वाचा परिचय देणारे असेही ‘एक लग्न’

By admin | Updated: February 21, 2016 01:24 IST

पाच-सहा वर्षांपूर्वी आई-वडिलांचा आणि मोठ्या भावाचाही झालेला मृत्यू येथील एका युवकाला पोरका करून गेला.

नातलग नसलेल्या युवकाचा धडाक्यात विवाह : मदतीसाठी सरसावले गावकरीकिशोर तेलंग तळेगाव (टा.)पाच-सहा वर्षांपूर्वी आई-वडिलांचा आणि मोठ्या भावाचाही झालेला मृत्यू येथील एका युवकाला पोरका करून गेला. बेघर वस्तीत राहून तो कुटुंबांचे स्वप्न रंगवित होता; पण कुणाचीही साथ नसल्याने एकाकी पडला होता. अशातच ग्रामस्थांची भरभक्कम साथ लाभली आणि चमत्कारच झाला. एकटाच जगत असलेल्या त्या युवकाचा विवाह सोहळा धडाक्यात पार पडला. मदतीसाठी गावकऱ्यांचे हात सरसावले आणि हा विवाह सोहळा खऱ्या अर्थाने सामाजिक दायित्वाचा परिचय देणारा ठरला. सतीश श्यामराव झाडे (३०), असे भाग्यशाली युवकाचे नाव आहे.गावातील वॉर्ड क्र. ४ येथील बेघर वस्तीत सतीश श्यामराव झाडे हा माळी समाजाचा मुलगा गत कित्येक वर्षांपासून एकाकी जीवन जगत होता. बहीण नाही, मोठ्या भावाचे निधन झालेले आणि आई-वडिलांचे छत्रही पाच-सहा वर्षांपूर्वीच हरविलेले! यामुळे कुटुंबात तो एकटाच राहिला. वडीलधारी मंडळी व विशेष नातलगही नसल्याने विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण होते. शिवाय शेती वा अन्य व्यवसाय नसल्यानेही लग्न जुळेना! ही खंत सतीशच्या मनात सलत होती. समाजातीलच काही होतकरू तरूणांना ही बाब कळली आणि सुरू झाली त्याचे लग्न जुळविण्याची सामाजिक धडपड! ग्रामस्थ व युवकांच्या पुढाकाराने सतीशचे लग्न जुळले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने हारावरच लग्न करावे, असा त्याचा मानस होता; पण पण वधुकडील मंडळीला मुलीचे लग्न करायचे होते. एकट्याने हे जमणार नाही, याची कल्पना आल्याने सतीशने सरपंच अतुल तिमांडे व ग्रा.पं. सदस्य गजानन येवतकार यांना माहिती दिली. त्याच्या आर्थिक स्थितीची सर्वांनाच जाणीव होती. परिणामी, सरपंच तिमांडे व सदस्य येवतकार यांनी ग्रामस्थांच्या पुढाकाराने तुझेही मोठे लग्न करू, असा धीर दिला. हा शब्द पाळण्यासाठी मग, सारे ग्रामस्थच एक झाले व सतीशचे लग्न धडाक्यात झाले. ग्रामस्थांच्या ऐक्याने हा विवाह आदर्श ठरला.वायगावात झाला विवाहतळेगाव (टा.) : बुधवारी (दि.१७) वायगाव (नि.) येथील बालाजी मंदिर येथे विवाह सोहळा आयोजित होता. नवरदेवासाठी एक चार चाकी, दोन-चार आॅटोसोबत बँडपथक होते; पण सतीशच्या सोज्वळ स्वभावामुळे लग्नाचे वऱ्हाडी आपापली सोय करीत वायगाव येथे पोहोचले. सायंकाळी नवरदेव तळेगाव येथे पोहोचताच ढोल-ताशाच्या निनादात वरातही काढली गेली. सतीशचा स्वागत समारंभही तेवढ्याच थाटात गुरूवारी (दि.१८) यशवंत हायस्कूल पार पडला. यात सुमारे ८०० वऱ्हाड्यांची जेवणाची सोय करण्यात आली होती. शिवाय नाचणाऱ्यासाठी ‘डीजे’ ठेवण्यात आला. सोज्वळ, मनमिळावू स्वभावाचा धनी असलेल्या सतीशला आशीर्वाद देण्यासाठी हजारो हात मदतीला सरसावले. गावातील सर्वानीच आपापल्या पद्धतीने मदत केली. सरपंच अतुल तिमांडे, ग्रा.पं. सदस्य गजानन येवतकार व भगतसिंग स्पोर्टींग क्लबने यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा सोहळा दोन कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा असल्याचा आणि सामाजिक दायित्वाचा परिचय तळेगावच्या ग्रामस्थांनी करून दिला.हळदीच्या कार्यक्रमातही २०० वऱ्हाड्यांची उठली पंगतसतीश लग्नासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. काहींनी पत्रिका छापल्या, कुणी लग्नाला लागणारे साहित्य घेऊन दिले, मुलाचे कपडे, मनी, डोरले नातलगांनी केले. वॉर्डातील महिलांनी त्याच्या हळद, न्हानोऱ्याची सोय केली. संपूर्ण गाव एकवटल्याने हळदीच्या जेवणाचा कार्यक्रमही मोठाच झाला. या कार्यक्रमात लग्नाच्या पूर्वसंध्येला २०० वऱ्हाड्यांच्या जेवणाचा कार्यक्रम लोकसहभागातून पार पडला. सतीश झाडे या मुलाचे कुटुंब व्यवस्थित चालावे यासाठी मी त्याला व्यवसाय लावून देणार आहे. शिवाय ज्या मुला-मुलींना कुणी नाही, त्यांना सहकार्य करण्यासाठी समाजातील पुढाऱ्यांनी मदत करणे गरज आहे. यापुढेही मी अशा मुला-मुलींच्या लग्नप्रसंगात मदत करीत राहील.- अतुल तिमांडे, सरपंच, ग्रा.पं. तळेगाव (टालाटुले)प्रत्येक गावात अशा मुला-मुलींना आधार मिळावा यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.- गजानन येवतकार, सदस्य, ग्रा.पं. तळेगाव (टा.)