शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 8, 2017 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती.

 शेतकऱ्यांच्या तुरीला ५०० रुपयांनी कमी भाव दिल्याचा आरोप आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती. ती शुक्रवारी पुन्हा सुरू झाली. यामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या तुरीला ३५० तर चण्याला ५०० रुपयाने प्रतिक्विंटल कमी भाव देत खरेदी केली. यात व्यापाऱ्यांकडून खुलेआम शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप येथील युवा शेतकरी मनीष उभाड यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज दुपारपासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केली. यात चना ५०० तर तूर ३५० रुपये कमी भाव देऊन लिलाव बोलल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट झाल्याचा आरोप होत आहे. जेव्हा की, आर्वी बाजार समिती सोडून अमरावती व इतर बाजार समितीमध्ये तूर व चणा वाढीव भावाने विकण्यात आले. त्या भावामध्ये ५०० रुपये प्रति क्विंटलची तफावत होती. सदरची तक्रार करण्याकरिता मनिष उभाड व इतर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी सचिव व संचालकांपैकी कोणीच उपलब्ध नसल्याने संध्याकाळी संबंधीत तक्रार लेखापालांकडे सोपविण्यात आली. लेखापाल यांच्याशी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक यांना बोलविण्याचा आग्रह धरला. यावेळी संध्याकाळी ७ वाजता सभापती दिलीप काळे, पोलीस ताफ्यासह बाजार समितीत दाखल झाले. सभापती सोबत शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावाबाबत सविस्तर चर्चा केली असता सभापतींनी संबंधीत सर्व व्यापारी व संचालक मंडळ यांना बोलावून आज घडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या होणाऱ्या लुटीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले; परंतु यात शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीकरिता आणलेला माल तसाच ठेवलेला आहे. या प्रकरणात शनिवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)