शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 8, 2017 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती.

 शेतकऱ्यांच्या तुरीला ५०० रुपयांनी कमी भाव दिल्याचा आरोप आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती. ती शुक्रवारी पुन्हा सुरू झाली. यामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या तुरीला ३५० तर चण्याला ५०० रुपयाने प्रतिक्विंटल कमी भाव देत खरेदी केली. यात व्यापाऱ्यांकडून खुलेआम शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप येथील युवा शेतकरी मनीष उभाड यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज दुपारपासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केली. यात चना ५०० तर तूर ३५० रुपये कमी भाव देऊन लिलाव बोलल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट झाल्याचा आरोप होत आहे. जेव्हा की, आर्वी बाजार समिती सोडून अमरावती व इतर बाजार समितीमध्ये तूर व चणा वाढीव भावाने विकण्यात आले. त्या भावामध्ये ५०० रुपये प्रति क्विंटलची तफावत होती. सदरची तक्रार करण्याकरिता मनिष उभाड व इतर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी सचिव व संचालकांपैकी कोणीच उपलब्ध नसल्याने संध्याकाळी संबंधीत तक्रार लेखापालांकडे सोपविण्यात आली. लेखापाल यांच्याशी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक यांना बोलविण्याचा आग्रह धरला. यावेळी संध्याकाळी ७ वाजता सभापती दिलीप काळे, पोलीस ताफ्यासह बाजार समितीत दाखल झाले. सभापती सोबत शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावाबाबत सविस्तर चर्चा केली असता सभापतींनी संबंधीत सर्व व्यापारी व संचालक मंडळ यांना बोलावून आज घडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या होणाऱ्या लुटीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले; परंतु यात शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीकरिता आणलेला माल तसाच ठेवलेला आहे. या प्रकरणात शनिवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)