शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आर्वी बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 8, 2017 00:35 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती.

 शेतकऱ्यांच्या तुरीला ५०० रुपयांनी कमी भाव दिल्याचा आरोप आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची खरेदी गत दहा ते बारा दिवसांपासून बंद होती. ती शुक्रवारी पुन्हा सुरू झाली. यामुळे खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या तुरीला ३५० तर चण्याला ५०० रुपयाने प्रतिक्विंटल कमी भाव देत खरेदी केली. यात व्यापाऱ्यांकडून खुलेआम शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप येथील युवा शेतकरी मनीष उभाड यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर आज दुपारपासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी लिलाव पद्धतीने सुरू केली. यात चना ५०० तर तूर ३५० रुपये कमी भाव देऊन लिलाव बोलल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे लूट झाल्याचा आरोप होत आहे. जेव्हा की, आर्वी बाजार समिती सोडून अमरावती व इतर बाजार समितीमध्ये तूर व चणा वाढीव भावाने विकण्यात आले. त्या भावामध्ये ५०० रुपये प्रति क्विंटलची तफावत होती. सदरची तक्रार करण्याकरिता मनिष उभाड व इतर शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी सचिव व संचालकांपैकी कोणीच उपलब्ध नसल्याने संध्याकाळी संबंधीत तक्रार लेखापालांकडे सोपविण्यात आली. लेखापाल यांच्याशी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक यांना बोलविण्याचा आग्रह धरला. यावेळी संध्याकाळी ७ वाजता सभापती दिलीप काळे, पोलीस ताफ्यासह बाजार समितीत दाखल झाले. सभापती सोबत शेतकऱ्यांनी शेतमालाच्या भावाबाबत सविस्तर चर्चा केली असता सभापतींनी संबंधीत सर्व व्यापारी व संचालक मंडळ यांना बोलावून आज घडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या होणाऱ्या लुटीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले; परंतु यात शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीकरिता आणलेला माल तसाच ठेवलेला आहे. या प्रकरणात शनिवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)