शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘मार्च एंडिंग’; सुटीतही कर्मचारी ‘आॅन ड्युटी’

By admin | Updated: March 29, 2015 02:05 IST

अधिकारी, कर्मचारी खासगी असो वा शासकीय त्यांना वर्षभर काम केल्यानंतर हिशेब द्यावाच लागतो़ वर्षभर केलेल्या कामांचा गोषवारा ...

वर्धा : अधिकारी, कर्मचारी खासगी असो वा शासकीय त्यांना वर्षभर काम केल्यानंतर हिशेब द्यावाच लागतो़ वर्षभर केलेल्या कामांचा गोषवारा व लेखे सादर करावे लागतात़ या काळात शासकीय सुट्याही व्यर्थच ठरतात़ सध्या मार्च एंडिंगमुळे रामनवमीची सार्वत्रिक सुटी व चवथा शनिवार असताना कर्मचारी कार्यरत दिसून आले़ शहरातील जवळपास सर्वच कार्यालयांत कर्मचारी काम करताना दिसून येत होते़ केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना वर्षभर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असते़ अधिकारी देखरेख ठेवत योजना राबवितात़ या योजनांवर शासनाकडून मोठा निधी खर्च केला जातो़ यातील किती निधी खर्च झाला, किती शिल्लक आहे, कोणत्या कामांवर किती खर्च झाला हे पाहण्यासाठी शासकीय कार्यालयांत मार्च महिनाच उगवतो़ प्रत्येक महिन्यात अहवाल सादर होत असला तरी मार्च महिन्यामध्ये वर्षभराचा हिशेब द्यावा लागतो़ याच महिन्यात राहिलेल्या कामांची लगबग सुरू होते़ एका वर्षात न झालेली कामे या ३० दिवसांत कशी पूर्ण होतील, यासाठी लगबग सुरू असल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)शासनाकडून जिल्ह्याला मिळणारा शासकीय निधी कोषागार अधिकारी कार्यालयातूनच प्राप्त होतो़ शिवाय अन्य निमशासकीय, खासगी रोख्यांची जबाबदारीही कोषागार कार्यालयाला सांभाळावी लागते़ यामुळे याच कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अधिक धावपळ करावी लागत असल्याचे दिसते़ शनिवारी सुटीच्या दिवशी उर्वरित कार्यालयात कमी कर्मचारी होते; पण कोषागार कार्यालयात सर्वाधिक कर्मचारी आणि तेही कार्यात व्यस्त दिसत होते़ जि़प़ वित्तविभाग, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य कार्यालयेही दिवसभर सुरू होती़