शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

मर्कटलीलांनी शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 19, 2015 02:20 IST

माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे.

अन्नधान्याचे नुकसान : शेतातील झाडे तोडण्याची वेळ सेवाग्राम : माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगतात. काही वर्षांत माकडांनी शेताकडे व आसपासच्या गावांकडे धाव घेतली आहे. प्यायला पाणी, खायला अन्न आणि फळझाडे असतील अश्या ठिकाणी माकडे धुडगूस घालत आहेत. घरच्या अंगणात, गच्चावर तसेच परसबागेत अन्नधान्य वाळत घातले असल्यास विचारायलाच नको अशी परिस्थिती होऊन जाते. गावाकडेच नाही तर शेतातही माकडांची उच्छाद मांदला आहे. यात पिकांचे बरच नुकसान होत असते. शेतकरी सातत्याने माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तराही माकडे जुमानताना दिसत नाही. त्यांनाही माणसांचे हाकलणे नित्याचे झाले असल्याने त्यांचा मुजोरपणा वाढला. आहे. महिलांवर तर अनेकदा ही माकडे हल्ला करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. यात लहान मुलांनाही धोका असतो. पूर्वी शेताच्या धुऱ्यावर शेतकरी अनेक प्रकारची झाडे लावत असे. यात आंबा, पेरू, जांभूळ आदी झाडांचा समावेश असायचा. परंतु याच झाडांवर माकडे उच्छाद मांडत असल्याने कंटाळून शेतकरी आता धुऱ्यावरील झाडे तोडत आहेत. यामुळे इंधनाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न पडला आहे.(वार्ताहर) अनेकदा शेतकरी व महिलांवर हल्ले माकडांचा मोठा कळपच गावात किंवा शेतात शिरत असतो. संख्येने जास्त असलेली माकडे कुणालाही जुमानत नाही. त्यामुळे तसेच हाकलण्यासाठी गेलेल्या अनेक शेतकरी व महिलांवर माकडांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. लहान मुलांना माकडांच्या मर्कटलीला पाहून आनंद होत असला तरी ही माकडे केव्हा हल्ला करतील याचा नेम नसतो.