शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

अत्यल्प किमतीमुळे अनेकांचा कापूूस घरीच

By admin | Updated: December 27, 2014 02:17 IST

नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली.

रोहणा : नापिकी, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ व अत्यल्प हमीभाव यामुळे खरिपाची दैना झाली. त्यामुळे दृष्टचक्रात सापडलेले रोहणापरिसरातील शेतकरी कृषी मूल्य आयोग कापसाचा हमीभाव केव्हा वाढविणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहे. अनेकांनी अद्यापही कापूस विकला नसून शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे. कापूस बियाणे सातशे रूपये प्रति बॅग वरून रू़ ९५०, बैल जोडीद्वारा पेरणी भाडे रू़५०० वरून १२००, डी़ए़पी़ रासायनिक खत ६०० वरून ११८४, फवारणीच्या कीटकनाशकांच्या किंमतीत सुमारे २५ टक्के झालेली वाढ, महिलांची मजुरी १०० वरून १५० तर पुरूषांची मजुरी १५० वरून २५० रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे उत्पादन खर्च भरमसाठ वाढला. प्रथम पावसाची दडी, नंतर अतीपाऊस, त्यानंतर वादळी पाऊस या नैसर्गिक संकटामुळे प्रचंड नापिकी व अत्यल्प उत्पादन या पार्श्वभूमीवर कापसाचे हमीभाव मागील तीन वर्षात ५० च्या फरकाने वाढवून ४ हजार ५० केले. मागील वर्षी कापूस उत्पादकांना खाजगी व्यापाऱ्यांनी रू़ ५ हजार ५०० पर्यंत भाव दिले़ जागतिक मंदीचे कारण पुढे करत खाजगी व्यापारी कापूस घेण्यास उत्सुक नाही़ शासनाने का कू करत काही मोजक्याच केंद्रांवर ४ हजार ५० रुपये हमीभाव देत कापूस खरेदी सुरू केली़ हा भाव कापूस उत्पादकांना अजिबात परवडणारा नाही़ त्यामुळे अनेकांनी आपला कापूस अद्याप विकायला न काढता घरीच ठेवला आहे. पण नाईलाज म्हणून काहींना तो मिळेल त्या भावात विकावा लागत आहे.(वार्ताहर)