शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अन् जखमींच्या भेटीला धावून आले होते मनोहर पर्र्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:07 IST

तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते.

ठळक मुद्देकेंद्रीय दारूगोळा भांडारातील ‘ती’ काळरात्र : घटनास्थळाची केली होती पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते. याच घटनेनंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वर्धा गाठले. त्यांनी पुलगाव येथील घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमातून काही वेळ काढत जखमी जवानांची सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.पुलगाव येथील केंद्रीय दारू गोळा भंडारात दोन वर्षांपूर्वी अग्निस्फोट झाला होता. या स्फोटात १९ जवान शहीद झाले होते. तसेच १९ जवान जखमी झाले होते. मध्यरात्री घडलेला हा स्फोट इतका भयावह होता की जणू भुकंप आला असेच हादरे परिसरातील गावांना बसले होते. शिवाय आगीचे लोळ देवळी शहरातील उंच इमारतीवरून तेथील अनेक नागरिकांनी बघितले होते. घटनेची माहिती मिळताच काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. मध्यरात्री घडलेल्या या घटनेची वार्ता दुसरा दिवस उजाडेपर्यंत वाऱ्यासारखीच परिसरात पसरल्याने सकाळी रुग्णालय व घटनास्थळाच्या आवारात बर्घ्यांची एकच गर्दी झाली होती.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्निशमन दलाच्या जवानांसह आदींकडून कसोशीचेच प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर सेनेच्या बड्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी झटपट आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून सवड काढून वर्धा गाठली होती. त्यांनी घटनास्थळाची पाहणी, दारूगोळा भंडारातील अधिकाºयांशी आटोपून जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय गाठले होते.त्यावेळी त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमींना तत्परतेने मदत पोहचविण्याबाबत तातडीचे निर्णय घेतले होते. शिवाय या घटनेतील शहीद कुटुंबीयांचे सात्वनही त्यांनी केले होते.त्यांच्या रूपाने त्यावेळी एक तत्पर व निर्णयक्षम संरक्षणमंत्री वर्धेकरांना पहावयास मिळाला. तत्कालीन संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी अचानक स्वादुपिंडाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.