शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

अन् जखमींच्या भेटीला धावून आले होते मनोहर पर्र्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:07 IST

तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते.

ठळक मुद्देकेंद्रीय दारूगोळा भांडारातील ‘ती’ काळरात्र : घटनास्थळाची केली होती पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते. याच घटनेनंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वर्धा गाठले. त्यांनी पुलगाव येथील घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमातून काही वेळ काढत जखमी जवानांची सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.पुलगाव येथील केंद्रीय दारू गोळा भंडारात दोन वर्षांपूर्वी अग्निस्फोट झाला होता. या स्फोटात १९ जवान शहीद झाले होते. तसेच १९ जवान जखमी झाले होते. मध्यरात्री घडलेला हा स्फोट इतका भयावह होता की जणू भुकंप आला असेच हादरे परिसरातील गावांना बसले होते. शिवाय आगीचे लोळ देवळी शहरातील उंच इमारतीवरून तेथील अनेक नागरिकांनी बघितले होते. घटनेची माहिती मिळताच काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. मध्यरात्री घडलेल्या या घटनेची वार्ता दुसरा दिवस उजाडेपर्यंत वाऱ्यासारखीच परिसरात पसरल्याने सकाळी रुग्णालय व घटनास्थळाच्या आवारात बर्घ्यांची एकच गर्दी झाली होती.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्निशमन दलाच्या जवानांसह आदींकडून कसोशीचेच प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर सेनेच्या बड्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी झटपट आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून सवड काढून वर्धा गाठली होती. त्यांनी घटनास्थळाची पाहणी, दारूगोळा भंडारातील अधिकाºयांशी आटोपून जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय गाठले होते.त्यावेळी त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमींना तत्परतेने मदत पोहचविण्याबाबत तातडीचे निर्णय घेतले होते. शिवाय या घटनेतील शहीद कुटुंबीयांचे सात्वनही त्यांनी केले होते.त्यांच्या रूपाने त्यावेळी एक तत्पर व निर्णयक्षम संरक्षणमंत्री वर्धेकरांना पहावयास मिळाला. तत्कालीन संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी अचानक स्वादुपिंडाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.